शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

व्यावसायिकांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:40 IST

नाशिक : शहरातील सार्वजनिक कार्यक्रम, विवाह समारंभ यांना गर्दी वाढू लागली आहे. काही ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात ...

नाशिक : शहरातील सार्वजनिक कार्यक्रम, विवाह समारंभ यांना गर्दी वाढू लागली आहे. काही ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक कार्यक्रम आयोजकांनी याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

टाकळीत अवजड वाहनांची वाहतूक वाढली

नाशिक : टाकळी गावातून अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. येथील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्ती आहे. याशिवाय लहान मुले रस्त्यावर खेळत असतात. पादचाऱ्याचीही वर्दळ असते. यासाठी अवजड वाहनांना वेळेची मर्यादा घालून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

झाडांजवळील रिप्लेक्टरची दुरवस्था

नाशिक : शहरातील काही मार्गांवर असलेल्या झाडांजवळ लावण्यात आलेल्या रिप्लेक्टरची दुरवस्था झाली आहे. यामुळे रात्रीच्यावेळी वाहनचालकांची दिशाभूल होते. अंधारामळे अनेक दुचाकीचालकांना समोर झाड असल्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील रिप्लेक्टरची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीस अडथळा

नाशिक : मालेगाव स्टॅण्ड येथून पेठरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर मखमलाबाद नाका येथे नेहमीच वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या ठिकाणी रस्ता अरुंद असून तीनही बाजूने वाहने येत असतात. त्यात एखादे मोठे वाहन आले तर ते जाईपर्यत वाहनांची मोठी रांग लागते. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

विहिरींनी तळ गाठल्याने चिंता

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही गावांमध्ये आतापासूनच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पाण्याच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. मात्र आता पाणी कमी पडू लागल्याने पीक येईल की नाही याची शास्वती राहिली नाही. पालखेड डाव्या कालव्याला रोटेशन सोडण्याची मागणी होत आहे.

उड्डाणपुलाखाली भिकाऱ्यांचे अतिक्रमण

दुभाजकांमधील झाडे वाढल्याने चिंता

नाशिक: शहरातील द्वारका चौक ते आडगाव पर्यंत उड्डाणपुलाखालील जागेवर भिकाऱ्यांनी अतिक्रमण केले असून रात्रीच्यावेळी हे भिकारी तेथेचे झोपतात यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. याबाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

नाशिक : फेम चौक ते अगर टाकळी रस्त्यावरील दुभाजकामध्ये असलेली झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत यामुळे पथदिव्यांचा प्रकाश पूर्णपणे रस्त्यावर पडत नाहीत. यामुळे या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य असते. या झाडांची छाटणी करावी, अशी मागणी त्रस्त वाहनचालकांनी केली आहे.