शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

व्यावसायिकांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:40 IST

नाशिक : शहरातील सार्वजनिक कार्यक्रम, विवाह समारंभ यांना गर्दी वाढू लागली आहे. काही ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात ...

नाशिक : शहरातील सार्वजनिक कार्यक्रम, विवाह समारंभ यांना गर्दी वाढू लागली आहे. काही ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक कार्यक्रम आयोजकांनी याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

टाकळीत अवजड वाहनांची वाहतूक वाढली

नाशिक : टाकळी गावातून अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. येथील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्ती आहे. याशिवाय लहान मुले रस्त्यावर खेळत असतात. पादचाऱ्याचीही वर्दळ असते. यासाठी अवजड वाहनांना वेळेची मर्यादा घालून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

झाडांजवळील रिप्लेक्टरची दुरवस्था

नाशिक : शहरातील काही मार्गांवर असलेल्या झाडांजवळ लावण्यात आलेल्या रिप्लेक्टरची दुरवस्था झाली आहे. यामुळे रात्रीच्यावेळी वाहनचालकांची दिशाभूल होते. अंधारामळे अनेक दुचाकीचालकांना समोर झाड असल्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील रिप्लेक्टरची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीस अडथळा

नाशिक : मालेगाव स्टॅण्ड येथून पेठरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर मखमलाबाद नाका येथे नेहमीच वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या ठिकाणी रस्ता अरुंद असून तीनही बाजूने वाहने येत असतात. त्यात एखादे मोठे वाहन आले तर ते जाईपर्यत वाहनांची मोठी रांग लागते. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

विहिरींनी तळ गाठल्याने चिंता

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही गावांमध्ये आतापासूनच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पाण्याच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. मात्र आता पाणी कमी पडू लागल्याने पीक येईल की नाही याची शास्वती राहिली नाही. पालखेड डाव्या कालव्याला रोटेशन सोडण्याची मागणी होत आहे.

उड्डाणपुलाखाली भिकाऱ्यांचे अतिक्रमण

दुभाजकांमधील झाडे वाढल्याने चिंता

नाशिक: शहरातील द्वारका चौक ते आडगाव पर्यंत उड्डाणपुलाखालील जागेवर भिकाऱ्यांनी अतिक्रमण केले असून रात्रीच्यावेळी हे भिकारी तेथेचे झोपतात यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. याबाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

नाशिक : फेम चौक ते अगर टाकळी रस्त्यावरील दुभाजकामध्ये असलेली झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत यामुळे पथदिव्यांचा प्रकाश पूर्णपणे रस्त्यावर पडत नाहीत. यामुळे या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य असते. या झाडांची छाटणी करावी, अशी मागणी त्रस्त वाहनचालकांनी केली आहे.