शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:40 IST

नाशिक : शहरातील सार्वजनिक कार्यक्रम, विवाह समारंभ यांना गर्दी वाढू लागली आहे. काही ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात ...

नाशिक : शहरातील सार्वजनिक कार्यक्रम, विवाह समारंभ यांना गर्दी वाढू लागली आहे. काही ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक कार्यक्रम आयोजकांनी याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

टाकळीत अवजड वाहनांची वाहतूक वाढली

नाशिक : टाकळी गावातून अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. येथील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्ती आहे. याशिवाय लहान मुले रस्त्यावर खेळत असतात. पादचाऱ्याचीही वर्दळ असते. यासाठी अवजड वाहनांना वेळेची मर्यादा घालून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

झाडांजवळील रिप्लेक्टरची दुरवस्था

नाशिक : शहरातील काही मार्गांवर असलेल्या झाडांजवळ लावण्यात आलेल्या रिप्लेक्टरची दुरवस्था झाली आहे. यामुळे रात्रीच्यावेळी वाहनचालकांची दिशाभूल होते. अंधारामळे अनेक दुचाकीचालकांना समोर झाड असल्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील रिप्लेक्टरची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीस अडथळा

नाशिक : मालेगाव स्टॅण्ड येथून पेठरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर मखमलाबाद नाका येथे नेहमीच वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या ठिकाणी रस्ता अरुंद असून तीनही बाजूने वाहने येत असतात. त्यात एखादे मोठे वाहन आले तर ते जाईपर्यत वाहनांची मोठी रांग लागते. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

विहिरींनी तळ गाठल्याने चिंता

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही गावांमध्ये आतापासूनच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पाण्याच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. मात्र आता पाणी कमी पडू लागल्याने पीक येईल की नाही याची शास्वती राहिली नाही. पालखेड डाव्या कालव्याला रोटेशन सोडण्याची मागणी होत आहे.

उड्डाणपुलाखाली भिकाऱ्यांचे अतिक्रमण

दुभाजकांमधील झाडे वाढल्याने चिंता

नाशिक: शहरातील द्वारका चौक ते आडगाव पर्यंत उड्डाणपुलाखालील जागेवर भिकाऱ्यांनी अतिक्रमण केले असून रात्रीच्यावेळी हे भिकारी तेथेचे झोपतात यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. याबाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

नाशिक : फेम चौक ते अगर टाकळी रस्त्यावरील दुभाजकामध्ये असलेली झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत यामुळे पथदिव्यांचा प्रकाश पूर्णपणे रस्त्यावर पडत नाहीत. यामुळे या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य असते. या झाडांची छाटणी करावी, अशी मागणी त्रस्त वाहनचालकांनी केली आहे.