शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

विस्कळीतपणा : नगराध्यक्ष, नगरसेवकांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट नांदगावला विकासकामांची ‘वाट’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:12 IST

नांदगाव : प्रशासनातल्या विस्कळीतपणामुळे शहरातील दैनंदिन व विकासकामांची वाट लागली असल्याची तक्र ार घेऊन नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या गटाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली.

नांदगाव : प्रशासनातल्या विस्कळीतपणामुळे शहरातील दैनंदिन व विकासकामांची वाट लागली असल्याची तक्र ार घेऊन नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या गटाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. पूर्णवेळ अभियंता नाही, मुख्य अधिकारी यांच्यासह जबाबदारीच्या पदांवरील अनेक कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळा पाळत नाहीत, नगरसेवकांनी केलेल्या ठरावांची अंमलबजावणी होत नाही आदी तक्रारींचे निवारण करण्याचे मान्य करून राधाकृष्णन बी. यांनी येवला-मनमाड येथील अभियंत्याला अतिरिक्त पदभार देणे, कर्मचाºयांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करणे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी नगर परिषद कार्यालयात अचानक पाठवून कामावर वेळेवर न येणाºया कर्मचाºयांची तपासणी करावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांना दिल्या.सहा महिन्यांपूर्वी नांदगाव येथे ग्रामविकास राज्यमंत्री दादाभाऊ भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत समस्यांबाबत नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी मुद्दा मांडला होता. भुसे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कामकाजात सुधारणा झाली नाही. अखेर नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांकडे धाव घेतली. यावेळी माणिकपुंज धरणातून पिण्याच्या पाण्याच्या दहा कोटी रु पये खर्चाच्या नवीन योजनेचा प्रस्ताव माहितीसाठी राधाकृष्णन यांच्याकडे नगराध्यक्षांनी सादर केला. सिन्नर येथील अभियंता फुलारे यांच्याकडे नांदगावचा अतिरिक्त पदभार आठवड्यातून दोन दिवसांसाठी देण्यात आला असून, तेही येथे नियमित येत नाहीत. त्यामुळे अतिक्रमण, बांधकाम व विकासकामांच्या तांत्रिक मंजुरी, देखरेख आदी कामे ठप्प झाली आहेत. उपनगराध्यक्ष कामिनी साळवे, नगरसेवक महावीर पारख, अभिषेक सोनवणे, नितीन जाधव, वाल्मीक टिळेकर, सुनंदा पवार, मनीषा काकळीज, संगीता जगताप, आदी उपस्थित होत्या. मनमाड शहर जवळ असून, तालुक्यातील असल्याने तेथील अभियंत्यास नांदगावचा अतिरिक्त पदभार देण्याच्या मागणीला जिल्हाधिकारी यांनी नकार दिला. लेखापाल (२), स्थापत्य अभियंता (२) व संगणक अभियंता (१), पाणीपुरवठा अभियंता (१), सहा. कर निरीक्षक (१), सहा. मिळकत व्यवस्थापक (१), सहा. खरेदी पर्यवेक्षक (१), अग्निशमन पर्यवेक्षक (१), सहा. नगररचनाकार (१) ही पदे रिक्त आहेत. १२ पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. प्रशासनाने कार्यवाही न केलेल्या १८० ठरावांच्या प्रतींची फाइल जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आली.