शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

न पाठविलेला ठराव विखंडणाचा आग्रह

By admin | Updated: December 14, 2015 23:56 IST

स्मार्ट सिटी : सत्ताधाऱ्यांनी उडविली भाजपाची खिल्ली

नाशिक : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ‘एसपीव्ही’वगळून महापालिकेने ठराव प्रशासनाला पाठविल्याने तो विखंडित करण्याचा आग्रह स्थानिक भाजपा आमदारांनी नागपूरला हिवाळी अधिवेशनाप्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे धरला; परंतु अद्याप कोणताही ठराव प्रशासनाला पाठविला गेलाच नसल्याने तो विखंडणासाठी आग्रह धरणाऱ्या भाजपा आमदारांची खिल्ली सत्ताधारी मनसेसह अन्य पक्षांनी उडविली. दरम्यान, महापालिकेने सायंकाळी अटीशर्ती टाकून ठराव प्रशासनाला पाठविल्याने भाजपा आमदारांचे ठराव विखंडणाचे प्रयत्न व्यर्थ ठरले. स्मार्ट सिटीअंतर्गत ‘एसपीव्ही’ वगळून महापौरांनी महासभेचा ठराव शुक्रवारीच प्रशासनाला पाठविला होता. त्याला नगरसचिव विभागाने दुजोराही दिला होता. त्यानुसार, नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने भाजपाचे आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, राहुल अहेर आणि अपूर्व हिरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कलम ४५१ अन्वये सदरचा ठराव विखंडित करून एसपीव्हीसह स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा आग्रह धरला. एसपीव्ही वगळून स्मार्ट सिटीचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. महापालिकेची महासभा ही सार्वभौम असते आणि तिचे अधिकार राज्य अथवा केंद्र सरकार हिरावून घेऊ शकत नाही. महासभेत केवळ दोन सदस्यांनीच चुकीच्या माहितीच्या आधारे विरोध दर्शविला होता, तर अन्य सदस्यांनी करवाढीला विरोध दर्शवित स्मार्ट सिटीचे समर्थन केले आहे. परंतु पीठासन अधिकारी असलेल्या महापौरांनी निर्णय देताना बहुमताचा कौल लक्षात न घेता दोन सदस्यांच्या विरोधाच्या आधारावर कौल देत जनमताचा अनादर केला आहे. त्यामुळे सदर ठराव विखंडित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे भाजपा आमदारांनी म्हटले आहे, परंतु सदर ठराव प्रशासनाला अद्याप रवानाच झाला नसताना त्याच्या विखंडणाचा आग्रह धरणाऱ्या भाजपा आमदारांच्या भूमिकेची सत्ताधारी मनसेसह अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी खिल्ली उडविली. भाजपा आमदारांना प्रसिद्धीची अतिघाई झाल्याचाही टोला एका पदाधिकाऱ्याने लगावला.