शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

भ्रमनिरास : शाळांमध्ये अपेक्षित उपक्रम राबविण्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष ‘विद्यार्थी दिन’ निव्वळ औपचारिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:15 IST

७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम शाळेत प्रवेश घेतला तो दिवस राज्यात ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे आदेश शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढले होते.

ठळक मुद्दे‘विद्यार्थी दिवस’ साजरा करण्याची निव्वळ औपचारिकताउपक्रम न राबविता केवळ शिक्षकांची भाषणे इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून कार्यक्रम नाही

नाशिक : ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम शाळेत प्रवेश घेतला तो दिवस राज्यात ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे आदेश शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढले होते. त्यानुसार सदर दिवस साजरा करण्यात आलाही मात्र जे उपक्रम राबविणे अपेक्षित होते त्याकडे शाळांनी दुर्लक्ष केल्यामुळे ‘विद्यार्थी दिवस’ साजरा करण्याची निव्वळ औपचारिकता शाळांनी पूर्ण केली असेच काहीसे चित्र शहरात दिसून आले.महाराष्टÑ शासनाने ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करावा, असे आदेश शाळांना २७ आॅक्टोबर रोजीच दिले होते. देशाचे संविधान निर्माते असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या शालेय जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती असावी आणि त्यांचे जीवनमूल्ये विद्यार्थ्यांना कळावित यासाठी शासनाने विद्यार्थी दिवस साजरा करण्याचे आदेश शाळांना दिले होते. प्रत्येक विद्यार्थी हा देशाचे भविष्य आहे. त्यामुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होण्यासाठी शिक्षण हेच एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमाची जाण सर्व विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी डॉ. आंबेडकरांचा शाळा प्रवेशाच्या दिवसाचे औचित्य साधण्यात आले आहे. या दिवशी सर्व शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलंूवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन आदी साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना शासनाने आॅक्टोबरमध्येच सर्व शाळांना दिलेल्या होत्या. असे असतानाही शाळांमध्ये अपेक्षित उपक्रम न राबविता केवळ शिक्षकांची भाषणे आणि प्रतिमा पूजन इतकेच कार्यक्रम घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. यास काही शाळा अपवाद नक्कीच आहेत. परंतु सध्या सुरू असलेल्या सहामाही परीक्षा आणि स्काउट गाइड शिबिरांमुळे शाळांकडून विद्यार्थी दिनाची फारशी दखलच घेण्यात आली नसल्यामुळे केवळ औपचारिकता म्हणून सदर दिवस साजरा करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. मराठी माध्यमांच्या शाळांनी निदान प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थी दिनाचा सन्मान तरी राखला आहे. मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून अपेक्षित कार्यक्रम राबविण्यात आले नाहीच शिवाय एकाच सत्रात अभिवादन कार्यक्रम करण्यात आल्याचीही चर्चा आहे.