शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

कांद्याला रोगांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:27 IST

ढगाळ हवामान, पहाटेचे धुके व दवबिंदूंमुळे कांदा पिकावर मावा, मर व करपा रोगांनी थैमान घातल्याने येवला तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कांदा पीक धोक्यात आले आहे. पीक वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त असून, उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने हमीभावाची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

ठळक मुद्देपाटोदा : औषधांची फवारणी

पाटोदा : ढगाळ हवामान, पहाटेचे धुके व दवबिंदूंमुळे कांदा पिकावर मावा, मर व करपा रोगांनी थैमान घातल्याने येवला तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कांदा पीक धोक्यात आले आहे. पीक वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त असून, उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने हमीभावाची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.येवला तालुक्यात नकदी पीक म्हणून कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी हजारो एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या पोळ कांद्याला परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून सावरत काही शेतकऱ्यांनी उशिराने कांदा रोपे टाकली, तर काहींनी उपलब्ध होईल तेथून मिळेल त्या भावात रोप विकत घेऊन हजारो हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड केली. यासाठी एकरी सुमारे एक लाख रु पयांपेक्षा जास्त खर्च आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल होत असून, पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत आहे, तर दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्याने कांदा पिकावर मर, मावा व करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. लागवड केलेला कांदा पोसण्यास सुरू झालेली असतानाच वातावरणात बदल झाल्याने कांदा पिवळा पडू लागला आहे. तसेच वाढही खुंटली आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.यावर्षी नाशिक जिल्ह्यात शेतकरीवर्गाने कोट्यवधी रु पये खर्च करून लाल, पोळ कांद्याची सुमारे ६८ हजार २२६ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली होती. मात्र ऐन मोसमात आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने मुक्काम ठोकल्याने सुमारे ५४ हजार ४०७ हेक्टर क्षेत्रावरील कांदा बाधित झाला, तर शिल्लक १३ हजार ८१८ हेक्टर क्षेत्रावरील पीक विविध रोगांचा बळी पडले.उत्पादनात मोठी घट आली आहे. परिणामी कांदा दराने उच्चांकी गाठली आहे. मात्र शेतकºयांकडे आता कांदाच शिल्लक नसल्याने या दरवाढीचा फायदा होत नसल्याची भावना शेतकºयांनी व्यक्त आहे.गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे कांदा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने महागड्या औषधांची फवारणी केली. मात्र रोग नियंत्रणात येत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे.- दत्तात्रय नाईकवाडे, कांदा उत्पादक, पाटोदा

 

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा