शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

रब्बी पिकांवर रोगांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:31 IST

मालेगाव तालुक्यात ९३.३४ टक्के रब्बी पिकांची लागवड केली जात आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांची धुळधाण केली होती. रब्बीच्या ...

मालेगाव तालुक्यात ९३.३४ टक्के रब्बी पिकांची लागवड केली जात आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांची धुळधाण केली होती. रब्बीच्या पिकांवरच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. ढगाळ व रिमझिम पाऊस पडत असल्याने शेती पिकांवर रोगराई येण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणाचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक बसण्याची शक्यता आहे. सध्या कांदा लागवड सुरू आहे. कांदा उळे (राेपे), शेंडे पिवळे पडू लागले आहेत. त्यांची वाढ खुंटणार आहे. तर कांदा पिकावरही करपा रोग येण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याला आलेली फुले गळण्याची शक्यता आहे. फुलोर अवस्थेत गाठी अळीचे आक्रमण झाल्यास हरभऱ्याच्या उत्पादनात प्रचंड घट हाेणार आहे. या रोगट वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पिके वाचविण्यासाठी महागडी रासायनिक औषधे खरेदी करून पिकांवर फवारणी केली जात आहे. येत्या २ ते ३ दिवस वातावरण असेच राहिल्यास रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरीही चिंताक्रांत झाला आहे.

कोट....

बदलत्या वातावरणाचा रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कांदा पिकावर करपा तर फुलोर अवस्थेतील हरभरा पिकाची फुले गळण्याची शक्यता आहे. हरभऱ्यावर गाठीअळीचे आक्रमण होऊ शकते. शेतकऱ्यांनी शेती तज्ज्ञांचे मत विचारात घेऊनच औषध फवारणी व उपाययोजना कराव्यात.

- बाळासाहेब व्यवहारे, तालुका कृषी अधिकारी

ढगाळ व रोगट वातावरणामुळे रासायनिक औषधांची फवारणी करण्याचा खर्च वाढला आहे. हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम अतिवृष्टीने हिरावून नेला. तर रब्बीच्या प्रारंभीच ढगाळ व रोगट वातावरणामुळे पिके धोक्यात सापडली आहे. शेतकरी हतबल झाला आहे.

- बाळकृष्ण शेवाळे, शेतकरी