शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पिकांवर रोगांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:31 IST

मालेगाव तालुक्यात ९३.३४ टक्के रब्बी पिकांची लागवड केली जात आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांची धुळधाण केली होती. रब्बीच्या ...

मालेगाव तालुक्यात ९३.३४ टक्के रब्बी पिकांची लागवड केली जात आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांची धुळधाण केली होती. रब्बीच्या पिकांवरच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. ढगाळ व रिमझिम पाऊस पडत असल्याने शेती पिकांवर रोगराई येण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणाचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक बसण्याची शक्यता आहे. सध्या कांदा लागवड सुरू आहे. कांदा उळे (राेपे), शेंडे पिवळे पडू लागले आहेत. त्यांची वाढ खुंटणार आहे. तर कांदा पिकावरही करपा रोग येण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याला आलेली फुले गळण्याची शक्यता आहे. फुलोर अवस्थेत गाठी अळीचे आक्रमण झाल्यास हरभऱ्याच्या उत्पादनात प्रचंड घट हाेणार आहे. या रोगट वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पिके वाचविण्यासाठी महागडी रासायनिक औषधे खरेदी करून पिकांवर फवारणी केली जात आहे. येत्या २ ते ३ दिवस वातावरण असेच राहिल्यास रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरीही चिंताक्रांत झाला आहे.

कोट....

बदलत्या वातावरणाचा रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कांदा पिकावर करपा तर फुलोर अवस्थेतील हरभरा पिकाची फुले गळण्याची शक्यता आहे. हरभऱ्यावर गाठीअळीचे आक्रमण होऊ शकते. शेतकऱ्यांनी शेती तज्ज्ञांचे मत विचारात घेऊनच औषध फवारणी व उपाययोजना कराव्यात.

- बाळासाहेब व्यवहारे, तालुका कृषी अधिकारी

ढगाळ व रोगट वातावरणामुळे रासायनिक औषधांची फवारणी करण्याचा खर्च वाढला आहे. हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम अतिवृष्टीने हिरावून नेला. तर रब्बीच्या प्रारंभीच ढगाळ व रोगट वातावरणामुळे पिके धोक्यात सापडली आहे. शेतकरी हतबल झाला आहे.

- बाळकृष्ण शेवाळे, शेतकरी