ओझर : येथील ग्रामसभा सरपंच हेमंत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी विविध नागरी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.भगतसिंगनगरात घंटागाडी ही येतच नसल्यामुळे कचरा हा येथील नागरिक शाळेच्या समोरच टाकतात. यापासून विद्यार्थ्यांना आजार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची मागणी एका शिक्षकाने केली. बाणगंगानगरातील रहिवासी महिला शौचालयाची दुरवस्था तसेच पुरुषांच्या शौचालयाची व्यवस्था करावी, असे नगरातील रहिवाशांनी प्रश्न उपस्थित केला.आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष यांनी ओझर महाविद्यालय, शाळा यांच्याकडून अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शैक्षणिक शुल्क आकारू नये, तसेच समाजकल्याण खात्याचा अध्यादेश आपण सर्व शैक्षणिक संस्थांना देणार असल्याचा ठराव यावेळी केला. तसेच ओझरमध्ये वाढत्या चोऱ्या होत असून, यातील चोरलेल्या वस्तू भंगार बाजारात नेऊन विकतात. या भंगार जमा करणाऱ्या व्यापारीवर्गाने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.जुना सिद्धपिंप्री रोड, खोतकर मळा, शेलार मळ्याजवळील रस्त्याबाबतची अनेक वर्षांपासूनची मागणी महिलांनी मांडली. ग्रामपंचायत सदस्य दखल घेत नसल्याची तक्रार करीत स्मशानभूमीच्या रस्त्यावर पथदीप बंद अवस्थेत आहे. तर पाण्याचा येथे पत्ताच नसल्याचे चौरे यांनी सांगितले. आनंदनगर भागातील पिण्याच्या पाण्याचा दाब तसेच रस्ते नवीन वस्तीत करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.नितीन जाधव यांनी ओझर बसस्थानकावर असलेल्या गलिच्छ घाण, कचरा, पाणी तुंबणे याचबरोबर चिंचेच्या झाडावर बसणारे बगळे हे परिसरात घाण करतात. यामुळे दुर्गंधी पसरते याबाबत परिवहन खात्याने त्वरित तोडगा काढावा, असे सांगितले.मतदान यादीत आपले नाव तपासावे, तसेच ग्रामपंचायत कार्यालयात बीएलओचे फोन नं. लावण्यात येतील काही मतदान नोंदणीबाबत अडचण असेल तर तलाठी उल्हास देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन व वाचन केले. व्यासपीठावर आरपीआयचे रवींद्र जाधव, दादाभाऊ केदारे, भाऊसाहेब कदम, बाळासाो. सयाजी जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील, डॉ. महेश ठाकूर, संजय पगार, गोविंद चौरे, नितीन जाधव, सुकदेव चौरे, संजय देवकर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
ओझर ग्रामसभेत विविध प्रश्नांवर चर्चा
By admin | Updated: August 21, 2014 00:13 IST