शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्येही पक्षांतराची चर्चा

By श्याम बागुल | Updated: July 30, 2019 18:31 IST

जिल्हा परिषदेचे सदस्य असताना विधानसभा निवडणूक लढवून विजयी झालेल्यांची प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. किंबहुना जिल्हा परिषदेनेच विधीमंडळाचे कवाडे खुले करून दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या किमान दहा ते पंधरा टक्के सदस्यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकीचे वेध लागतात.

ठळक मुद्देयुतीवर भवितव्य अवलंबून : एकमेकांविषयी संशयी भूमिकापक्षांतर करून उमेदवारी मिळेलच कोणतीही शाश्वती आजच्या घडीला कोणी देवू शकत नाही.

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र पक्षांतराचे वारे वाहू लागल्याने नाशिक जिल्ह्यातही भाजप वगळता सर्वपक्षीयांमध्ये पक्षांतराची जोरदार चर्चा होवू लागली असून, विशेष करून जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये या संदर्भातील उत्सूकता अधिक आहे. बहुतांशी जिल्हा परिषद सदस्यांना आमदारकीचे स्वप्न पडून त्यांनी त्या दृष्टीने तयारीही चालविली असली तरी, युती, आघाडीकडून जागा कोणाला सुटते त्यावर पक्षांतर करण्यासाठी पक्ष ठरविण्याची भूमिका घेण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे सदस्य असताना विधानसभा निवडणूक लढवून विजयी झालेल्यांची प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. किंबहुना जिल्हा परिषदेनेच विधीमंडळाचे कवाडे खुले करून दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या किमान दहा ते पंधरा टक्के सदस्यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकीचे वेध लागतात. यंदा मात्र काहीशी वेगळी परिस्थिती असून, विरोधी पक्षाचे आमदार व वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने सत्ताधारी भाजप-सेनेकडे आकृष्ट होऊ लागल्याने दररोज पक्षांतराचे सोहळे रंगू लागले आहेत. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्यापुर्वी विरोधी पक्ष गर्भगळीत झाल्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून कॉँग्रेस व राष्टÑवादीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांची घालमेल वाढली आहे. सत्ताधारी पक्षांकडे अगोदरच इनकमिंग अधिक असल्याने पक्षांतर करून उमेदवारी मिळेलच कोणतीही शाश्वती आजच्या घडीला कोणी देवू शकत नाही. अशा परिस्थितीत पक्षांतर करूनही उपयोग होईल काय असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे. त्यातही भाजप व सेनेकडे असलेल्या इच्छुकांची संख्या पाहता, विधानसभा निवडणुकीत युती होण्याविषयीही या सदस्यांना साशंकता वाटू लागली आहे. सत्ताधाऱ्यांप्रमाणेच या सदस्यांनाही युती होऊच नये अशी वाटू लागले असून, तसे झाल्यास पक्षांतराचा विचार करणे अधिक योग्य व सोयीचे होईल असा त्यांचा ºहोरा आहे. त्यामुळे सध्या जिल्हा परिषदेत येणाºया सर्वपक्षीय सदस्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची व त्यातल्या त्यात मतदार संघातील उमेदवारांविषयीच चर्चा झडू लागली आहे.यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी उपाध्यक्ष नयना गावीत, बांधकाम सभापती मनिषा पवार, नितीन पवार, हिरामण खोसकर, भास्कर गावीत, अमृता पवार, सिमंतीनी कोकाटे, डॉ. आत्माराम कुंभार्डे, अश्विनी आहेर या जिल्हा परिषद सदस्यांसह झेरॉक्स म्हणून ओळखले जाणारे समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांचे पती माजी आमदार रामदास चारोस्कर, सदस्य अश्विनी आहेर यांचे पती जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर, सदस्य रूपांजली माळेकर यांचे पती विनायक माळेकर, सदस्य बलवीर कौर यांचे पूत्र बंटी गिल यांचे नावे चर्चेत आहेत. प्रत्येकाने आपल्यापरिने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली असली तरी, उमेदवारी कोणाकडून करायची याचा निर्णय अधांतरीत ठेवण्यात आला आहे. निवडून आणण्याची क्षमता ठेवणाºया व सध्या हवा असलेल्या पक्षाकडेच या सदस्यांचा सर्वाधिक ओढा दिसत आहे.

टॅग्स :Politicsराजकारणnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद