शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

औद्योगिक क्षेत्रातील अडचणींबाबत राज्यमंत्र्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:14 IST

कोविडमुळे अर्थकारणाची घडी विस्कटली आहे. उद्योजकांना देखील मोठा फटका बसला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी उद्योजक धडपड करीत आहेत. त्यासाठी ...

कोविडमुळे अर्थकारणाची घडी विस्कटली आहे. उद्योजकांना देखील मोठा फटका बसला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी उद्योजक धडपड करीत आहेत. त्यासाठी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित असलेले प्रकल्प रखडलेले आहेत. त्यांना चालना देणे गरजेचे आहे. कायमस्वरुपी औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या मागणीचा प्रश्न निकाली काढणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रदर्शनासाठी जागा निश्चित केली होती. आता कार्यवाही संथावली आहे. उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून डीपीआर मंजूर करून काम सुरू करण्यात यावे, नाशिकला प्लेटिंग उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. प्लेटिंग उद्योगांसाठी सामायिक सांडपाणी प्रकल्प (सीईटीपी) दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. या प्रकल्पासाठी प्लेटिंग उद्योगांनी चार कोटी रुपयांचा निधी जमा करून ठेवला आहे. केवळ एमआयडीसी आणि एमपीसीबी यांच्यातील समन्वयाअभावी रखडलेल्या या प्रकल्पाला चालना द्यावी. कोरोना झालेल्या औद्योगिक कामगार रुग्णांना ईएसआयसीच्या माध्यमातून उपचार मिळालेत. परंतु ईएसआयसीने त्यांच्या रजा भरून दिलेल्या नाहीत. याबाबत लवकर निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा. यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष रंजन ठाकरे, निमा विश्वस्त मंडळाचे मंगेश पाटणकर, मनीष रावल, समीर पटवा, नितीन वागस्कर,राजेश गडाख, निखिल पांचाळ,विनायक गोखले,सुदर्शन डोंगरे,राजेंद्र अहिरे,रवींद्र झोपे आदींसह उद्योजकांनी उद्योग व पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदन दिले.

चौकट==

कोरोनामुळे पर्यटन उद्योगाला फटका

दरम्यान, आदिती ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पक्ष पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना कोरोनामुळे पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकला धार्मिक, ॲग्रो व मेडिकल पर्यटन वाढीची मोठी संधी असून, त्यासाठी आगामी काळात शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.

(फोटो २१ उद्योग) उद्योग व पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देताना निमा विश्वस्त मंडळाचे मंगेश पाटणकर,मनीष रावल,समीर पटवा,नितीन वागस्कर, राजेश गडाख,निखिल पांचाळ, विनायक गोखले,सुदर्शन डोंगरे,राजेंद्र अहिरे,रवींद्र झोपे आदी.