शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

बायाेमायनिंग ठेक्यावर चर्चा; १ एप्रिलला विशेष महासभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:10 IST

आयुक्त अविश्वास प्रस्तावावर सत्ताधारी व विराेधकांनी एकजूट दाखविली हाेती. मात्र, बायाेमायनिंगच्या मुद्द्यावर विराेधक व सत्ताधारी पुन्हा आमने-सामने आले आहेत. ...

आयुक्त अविश्वास प्रस्तावावर सत्ताधारी व विराेधकांनी एकजूट दाखविली हाेती. मात्र, बायाेमायनिंगच्या मुद्द्यावर विराेधक व सत्ताधारी पुन्हा आमने-सामने आले आहेत. माजी आमदार रशीद शेख, ज्येष्ठ नगरसेवक सखाराम घाेडके व इतर ३२ नगरसेवकांनी बायाेमायनिंग निविदेचा पुनर्विचार करुन याेग्य निर्णय घेण्याची मागणी केली आहे. या मागणीनुसार महापाैर ताहेरा शेख यांनी दिनांक १ एप्रिलला दुपारी चार वाजता ऑनलाईन विशेष महासभा बाेलावली आहे. महापालिकेने डम्पिंग ग्राऊंडवर बायाेमायनिंग पध्दतीने घनकचरा वर्गीकरण व खत निर्मिती प्रक्रिया केंद्र उभारले आहे. या कामासाठी मनपाने ३ काेटी १० लाखाची निविदा काढली हाेती. पुरवठा आदेशात अत्याधुनिक मशीनच्या दाेन नगांसाठी एक काेटी ८० लाख रुपये नमूद केले आहे. एका मशीनद्वारे घनकचरा वर्गीकरण प्रक्रिया सुरु केली हाेती. दुसरी मशीन बसवून घेणे गरजेचे असताना या मशीनसाठी जागा उपलब्ध करून न देता पहिली मशीन बंद केली. कचरा वर्गीकरण प्रक्रिया थांबल्याने जनतेच्या पैशांचे नुकसान झाले आहे. प्रकल्प बंद करुन दुसरी मशीन खरेदी न करता जागा देण्यास टाळाटाळ केल्याने ठेकेदार कंपनीने उच्च न्यायालयात मनपाविराेधात रिट याचिका दाखल केली आहे. एक प्रकल्प एक निविदा संपुष्टात आणून दुसरी निविदा निर्गमित केली. या प्रकल्पाचा ठेका घेणाऱ्या मक्तेदाराने फक्त एक मशीन बसवून कचरा रिसायकलिंगचे काम सुरु केले आहे. कचऱ्यातून पैसा कमावण्याचा उद्याेग सत्ताधारी करीत आहेत तसेच ही महासभा याचिकेच्या भीतीने बाेलावल्याचा आराेप जनता दलचे नगरसेवक मुस्तकिम डिग्निटी यांनी केला. कचऱ्यातून पैसा कमावण्याचा सत्ताधाऱ्यांचा उद्याेग याचिकेद्वारे चव्हाट्यावर आणणार आहे. महासभेत निविदा रद्द करून सावरासावर झाली तरी न्यायालयीन लढा शेवटपर्यंत लढणार असल्याचे डिग्निटी यांनी स्पष्ट केले. दरम्यान

अविश्वास आणताना आग्रा राेड, बायाेमायनिंग, स्वच्छता कामांचे आऊटसाेर्सिंग, घरपट्टी सर्व्हे, साैर ऊर्जा प्रकल्प, गिरणा पंपिंग मशिनरी दुरुस्ती या कामांचा समावेश केला हाेता. मात्र, चर्चा फक्त बायाेमायनिंगवरच का, असा प्रश्न एमआयएमचे नगरसेवक डाॅ. खालिद परवेज यांनी उपस्थित केला आहे. सत्ताधाऱ्यांची नियत साफ असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्तावात समाविष्ट केलेली कामे महासभेत ठेवून रद्द करावी, असे आव्हान डाॅ. खालिद यांनी दिले.