शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

जिल्ह्यातील सहा धरणांमधून विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याने, धरणांमधील पाण्याच्या पातळीतही वाढ होऊ लागली आहे. निम्म्यापेक्षा ...

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याने, धरणांमधील पाण्याच्या पातळीतही वाढ होऊ लागली आहे. निम्म्यापेक्षा अधिक धरणांमधील पाण्याची पातळी ९० टक्क्यांच्या पुढे गेल्याने विसर्गला सुरुवात करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सहा धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. रविवारी सकाळपासून गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरण समूहात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली असल्याने, दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे. रविवारी दुपारी १२ वाजेपासून दारणासह कडवा, आळंदी, वालदेवी, नांदुरमध्यमेश्वर, तसेच गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दारणामधून १०,०६०, कडवामधून १,६९६, आळंदीमधून ३०, वालदेवी धरणातून १८३ , नांदुरमध्यमेश्वर येथून १३,४२७ तर गंगापूर धरणातून ५५३ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढत असल्याने, दुपारी तीन वाजेनंतर दारणा धरणातून होणारा विसर्ग १२ हजार ७८८ क्युसेक इतका करण्यात आला. सकाळी एक हजार क्युसेक इतकाच विसर्ग केला जात होता.

धरणांमधून विसर्ग सुरू झाल्याने, नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास रात्री उशिरापर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविला जाण्याचीही शक्यता आहे. मागील वर्षी गंगापूर धरणातून जवळपास दोन हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली होती. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत विसर्ग कमी होण्याची शक्यता आहे. धरण समूहातील इतर धरणांमध्ये अपेक्षित पाणी जमा झाले नसल्याने गंगापूरमधून होणारा विसर्ग मर्यादित राहाणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गौतमी, कश्यपी धरणाच्या पाण्याची पातळीत वाढ हेात आहे.