शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

नांदूरमधमेश्वरमधून ९६६७ क्यूसेकचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:14 IST

सायखेडा : दारणा आणि गंगापूर धरणातून गोदावरी नदीला पाणी सोडल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, पूरपरिस्थिती निर्माण होऊ ...

सायखेडा : दारणा आणि गंगापूर धरणातून गोदावरी नदीला पाणी सोडल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नांदूरमधमेश्वर धरणातून ९६६७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे तूर्तास गोदाकाठ भागातील पूरपरिस्थितीचा धोका टळला आहे.

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुक्यात चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. पावसाच्या माहेरघरी पाऊस पडत असल्यामुळे त्या परिसरातील धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे. दारणा धरणातून ५५४० आणि गंगापूर धरणातून ३०६८ इतक्या पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात काल दुपारी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली. गोदाकाठ भागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला आहे.

----------------------------

पुराचा धोका टळला

गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली की सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चाटोरी, चापडगाव, मांजरगाव, काथरगाव, दिंडोरी चास, कोठुरे, गोंडेगाव या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसतो. सगळीकडे पाणी पसरते आणि शेतातील पिके पाण्याखाली येतात. पाणी काही महिने कमी होत नाही. त्यामुळे हाती आलेले पीक वाया जाते असे अनेक वर्ष सातत्याने घडते. त्यामुळे धरणात साचलेला गाळ काढून गेटची संख्या वाढवणे गरजेचं आहे. म्हणजे पूर पाण्याचा फटका शेतीला बसणार नाही आणि गाव पाण्याखाली येणार नाहीत. गोदाकाठ भागात पाऊस पडत नसल्याने केवळ इतर धरणांतून येणाऱ्या पाण्यामुळे विसर्ग वेळेत सोडल्याने पुराचा धोका टळला आहे. अन्यथा यंदाचा पहिला पूर गोदाकाठ भागात आला असता असे जाणकार सांगतात.

-----

गोदावरी नदीच्या पात्रात नांदूरमधमेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे धरणाच्या गेटजवळ पाणी कमी जाते. जास्त पाण्याचा फ्लो मागे राहातो. त्यामुळे गोदाकाठला पूरपरिस्थिती निर्माण होते, शेती पाण्यात अनेक महिने राहिल्याने नुकसान होते.

- गोकुळ गिते, माजी संचालक, पिंपळगाव बाजार समिती

----

नांदूरमध्यमेश्वर धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग. (३० नांदूरमधमेश्वर १/२/३)

300721\30nsk_15_30072021_13.jpg

३० नांदुरमधमेश्वर १/२/३