शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

अनावश्यक खर्चाला फाटा द्या

By admin | Updated: September 8, 2015 22:59 IST

येवला : मध्यवर्ती गणेश मंडळ समितीच्या बैठकीत आवाहन

 येवला : सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन मध्यवर्ती गणेश मंडळ समितीच्या वतीने करण्यात आले. तालुक्यासह महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असून, पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकरी चिंतातुर झाला आहे. बळीराजाला दिलासा देण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर येवल्यातील हुडको परिसरातील क्रीडा प्रबोधिनी येथे मध्यवर्ती गणेश मंडळ समितीच्या सभासदांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीत सदस्यांनी विधायक सूचना मांडल्या. यामध्ये अनावश्यक खर्चाला फाटा देऊन मिरवणुकीत डीजेचा वापर करू नका, साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा असे ठरविण्यात आले. भविष्यात अशा प्रकारचे संकट येऊ नये यासाठी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी योजावे लागणारे उपाय यावर चर्चा करण्यात आली. पाणी बचत कशी करता येईल, पाणीसाठा कसा वाढवता येईल, झाडे लावा झाडे जगवा यासारखे विषय घेऊन सजावट व समाजप्रबोधन कसे होईल याकडे लक्ष द्यावे, असे बैठकीत ठरविण्यात आले. मध्यवर्ती गणेश मंडळाचे प्रमुख किशोर सोनवणे यांनी दरवर्षी मंडळाच्या वतीने उत्कृष्ट व समाजप्रबोधन करणारे देखावे व विविध उपक्र मांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येत असल्याचे सांगून, शहरात अनेक मंडळे सामाजिक,धार्मिक विषयांवर समाजप्रबोधन करतात.यामुळे भविष्यात गणेशोत्सव हा लोकांना मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडेल, असे स्पष्ट केले. सांस्कृतिकार प्रभाकर झळके यांनी येवला शहर हे उत्सवप्रिय असून, यावेळी पारस भंडारी, डॉ. भूषण शिनकर, तरंग पटेल, प्रमोद सस्कर, अतुल पैठणकर, आनंद शिंदे, दत्ता महाले, सचिन सोनवणे, सुभाष गांगुर्डे, रवि पवार, विष्णू कऱ्हेकर, गणेश सोनवणे, उत्तम घुले, दिलीप बाबर, किरण सूर्यवंशी, राजेंद्र पवार, गौरव कांबळे, नारायण शिंदे, महेश भावसार, किरण सरोदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन २०१४ च्या गणेश आरास स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, असे समितीच्या वतीने यावेळी जाहीर करण्यात आले. (वार्ताहर)