शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अनावश्यक खर्चाला फाटा द्या

By admin | Updated: September 8, 2015 22:59 IST

येवला : मध्यवर्ती गणेश मंडळ समितीच्या बैठकीत आवाहन

 येवला : सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन मध्यवर्ती गणेश मंडळ समितीच्या वतीने करण्यात आले. तालुक्यासह महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असून, पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकरी चिंतातुर झाला आहे. बळीराजाला दिलासा देण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर येवल्यातील हुडको परिसरातील क्रीडा प्रबोधिनी येथे मध्यवर्ती गणेश मंडळ समितीच्या सभासदांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीत सदस्यांनी विधायक सूचना मांडल्या. यामध्ये अनावश्यक खर्चाला फाटा देऊन मिरवणुकीत डीजेचा वापर करू नका, साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा असे ठरविण्यात आले. भविष्यात अशा प्रकारचे संकट येऊ नये यासाठी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी योजावे लागणारे उपाय यावर चर्चा करण्यात आली. पाणी बचत कशी करता येईल, पाणीसाठा कसा वाढवता येईल, झाडे लावा झाडे जगवा यासारखे विषय घेऊन सजावट व समाजप्रबोधन कसे होईल याकडे लक्ष द्यावे, असे बैठकीत ठरविण्यात आले. मध्यवर्ती गणेश मंडळाचे प्रमुख किशोर सोनवणे यांनी दरवर्षी मंडळाच्या वतीने उत्कृष्ट व समाजप्रबोधन करणारे देखावे व विविध उपक्र मांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येत असल्याचे सांगून, शहरात अनेक मंडळे सामाजिक,धार्मिक विषयांवर समाजप्रबोधन करतात.यामुळे भविष्यात गणेशोत्सव हा लोकांना मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडेल, असे स्पष्ट केले. सांस्कृतिकार प्रभाकर झळके यांनी येवला शहर हे उत्सवप्रिय असून, यावेळी पारस भंडारी, डॉ. भूषण शिनकर, तरंग पटेल, प्रमोद सस्कर, अतुल पैठणकर, आनंद शिंदे, दत्ता महाले, सचिन सोनवणे, सुभाष गांगुर्डे, रवि पवार, विष्णू कऱ्हेकर, गणेश सोनवणे, उत्तम घुले, दिलीप बाबर, किरण सूर्यवंशी, राजेंद्र पवार, गौरव कांबळे, नारायण शिंदे, महेश भावसार, किरण सरोदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन २०१४ च्या गणेश आरास स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, असे समितीच्या वतीने यावेळी जाहीर करण्यात आले. (वार्ताहर)