शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

जिल्हा आपत्ती विभागावर पुन्हा ओढवली आपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:20 IST

नाशिक : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या अर्जुन कुऱ्हाडे यांची पुणे येथे बदली झाल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागावर ...

नाशिक : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या अर्जुन कुऱ्हाडे यांची पुणे येथे बदली झाल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागावर पुन्हा एकदा आपत्ती कोसळली आहे. महिनाभरापूर्वी या विभागाच्या अधिकाऱ्याने तडकाफडकी राजीनामा दिल्याने कुऱ्हाडे याच्याकडे पदभार देण्यात आला होता. आता त्यांचीही बदली झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने त्यांची बदली रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करूनही त्यात त्यांना यश आलेले नाही.

गेल्या २६ जुलै रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी अचानक राजीनामा दिल्याने आपत्ती विभाग चर्चेत आला होता. वाघमारे यांच्या बदलीमागे जिल्हाधिकाऱ्यांशी असलेला बेबनाव कारणीभूत असल्याची चर्चा रंगल्याने या विभागात कुणीची वर्णी लागते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारे यांचा अर्ज मान्य करीत दुसऱ्या नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रण अर्जुन कुऱ्हाडे यांच्याकडे या विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. कुऱ्हाडे यांनीदेखील पदभार घेताच धडक कामाला सुरुवात केली होती.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिशा मिळाली असल्याचे वाटत असतानाच गेल्या महिन्याच्या अखेरीस कुऱ्हाडे यांच्या बदलीचे आदेश निघाले. या आदेशामुळे त्यांचीदेखील धावपळ झाली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनीही नागरी संरक्षण दल विभागाच्या प्रमुखांना तातडीने बदली स्थगित करण्याबाबतचे पत्र ई-मेल केले होते. दरम्यानच्या काळात पुण्याहून बदलून आलेल्या अधिकाऱ्याने नागरी संरक्षण दलाचा कार्यभार घेतल्यामुळे कुऱ्हाडे यांनी बदलीच्या ठिकाणी जाणे क्रमप्राप्त ठरले.

मागील महिन्याच्या अखेरच्या सप्ताहापासून सुरू झालेल्या या नाट्यमय घडामोडीनंतरही जिल्हा आपत्ती विभागाच्या प्रमुखाला आपले कार्यालय सोडावे लागले आणि त्यांनी मंगळवारी (दि.७) पुणे येथे जाऊन पदभार घेतल्याचे वृत्त आहे. जिल्हा आपत्ती विभागाचे पद हे तात्पुरते आणि मानधनावरील असल्यामुळे कुऱ्हाडे यांना परत बोलविण्याबाबत कार्यवाही होण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे. कुऱ्हाडे यांचे पद हे वर्ग-१ चे असल्यामुळे त्यांना केवळ आपत्ती विभागाच्या पदावर राहणेही शक्य होणार नाही. त्यामुळे कदाचित पुण्याहून बदलून आलेल्या अधिकाऱ्याकडे आपत्ती विभागाचादेखील पदभार दिला जाण्याची शक्यता आहे.

--इन्फो--

ऐन पावसाळ्यात पद रिक्त

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने आपत्ती विभागाची जबाबदारीदेखील या काळात वाढते. दुर्दैवाने याच काळात वाघमारे यांना राजीनामा द्यावा लागाल होता, तर अवघ्या दीड महिन्यात अतिरिक्त जबाबदारी असलेल्या अर्जुन कुऱ्हाडे यांचीदेखील बदली झाल्यामुळे जिल्ह्यावर नामुष्की ओढवली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अतिशय महत्त्वाचे पद रिक्त ठेवणे जिकरीचेदेखील आहे. त्यामुळे आता या विभागाची धुरा कोणाकडे सोपविली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.