शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती‘प्रवण’ व्यवस्थापन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:08 IST

: ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ असे म्हणत महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यात कोणतीही आपत्ती येऊ नये यासाठी काळजी घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज केली जाते. तशी यंदाही यंत्रणा सज्ज झाली आहे.

नाशिक : ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ असे म्हणत महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यात कोणतीही आपत्ती येऊ नये यासाठी काळजी घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज केली जाते. तशी यंदाही यंत्रणा सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पूर्वतयारीसाठी बैठकादेखील पार पडल्या आहेत. परंतु हा विभाग किंवा महापालिका खरोखरच आपत्ती निवारणासाठी सज्ज आहे काय? दरवर्षीच्या त्याच त्या धोकादायक वाड्यांना नोटिसा, नदीपात्रातील झोपडपट्टीवासीयांना स्थलांतरित करण्याचे इशारे यापलीकडे आपत्ती निर्मूलनासाठी काय सज्ज केले जाते हा महत्त्वाचा भाग आहे. २००८ मध्ये आलेल्या महापुराने अनेक धडे दिले, परंतु पूररेषा कमी करण्यासाठी कोणतीही केंद्र शासनाच्या अंकित संस्थेने अनेक शिफारसी करून त्याचा निर्णय घेतला गेलेला नाही. पुराची तीव्रता कमी व्हावी यासाठी प्रवाहाला अवरोध करणारी बांधकामे, मिळकती इतकेच नव्हे तर पूल आणि बंधारे हटविण्याची शिफारस कागदावरच आहे. गावठाणातील धोकादायक वाड्यांचा प्रश्न नोटिसांनी सुटणार नाही तर त्याला क्लस्टर अंतर्गत कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची केवळ चर्चाच होत आहे. त्यावर कार्यवाही नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्या आपत्ती व्यवस्थापन दलाच्या भरवशावर निर्धास्त राहायचे तो विभागाच दुबळा आहे. ना प्रमुख ना कर्मचारी आणि नाही त्यांच्याकडे पुरेशी साधने. महापालिकेच्या वतीने रस्त्यांपासून ग्रीन जीमपर्यंत अनेक बाबींवर खर्च केला जातो. परंतु आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्षम करण्यासाठी मात्र खर्च केला जात नाही. या दलाला प्रमुखही पूर्णवेळ नाही, मग खरोखरीच आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज आहे काय? असा प्रश्न पडतो. त्यामुळेच महापालिकेच्या कामकाजाचे आणि प्रलंबित प्रश्नांचे हे परखड विश्लेषण..कांबळेवाडी दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची प्रतीक्षा?गोदावरी, नासर्डी, वाघाडी, वालदेवी अशा अनेक नद्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या असतात. पावसाळ्यात त्यांना केवळ नोटिसा बजावल्या जातात, परंतु नंतर मात्र कोणत्याही प्रकारे कारवाई होत नाही. संबंधित झोपडपट्टीधारक हटत नाही आणि महापालिकादेखील दुर्लक्ष करते. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी सातपूर येथे कांबळेवाडी या झोपडपट्टीत अनेक झोपड्या एका कंपनीच्या संरक्षक भिंतीलगत वसलेल्या होत्या. पावसाळ्यात पाणी मुरून ती संरक्षक भिंत कोसळली आणि सहा जणांचा बळी गेला. त्यानंतरही केवळ झोपडपट्टी हटविण्याबाबत चर्चा झाली. प्रत्यक्षात कृती झालेली नाही. उलट कांबळेवाडी झोपडपट्टी वाढत आयटीआय पुलालगत पोहोचली, परंतु महापालिकेने ती हटविली नाही. अशा अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या असून, महापालिका केवळ नोटिसा बजावण्याची आपैचारिकताच पार पाडते. त्यानंतर मात्र कोणतीही कार्यवाही केली जात नाही. यंदाही हेच काम सुरू असून, कांबळेवाडीच्या दुर्घटनेची पुनरावृत्तीची यंत्रणा प्रतीक्षा करते आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.सदोष भुयारी गटार योजना; गावठाणातील समस्या ‘जैसे थे’संपूर्ण शहरासाठी महापालिकेने भुयारी गटार योजना राबविली आहे. परंतु, त्यात अनेक त्रुटी आहेत. त्याचे परिणाम आजही शहरातील काही भागाला भोगावे लागत आहेत. विशेषत: महापालिकेने सारडा सर्कल येथून द्वारकाकडून भुयारी गटार नेण्याची गरज असताना ते तांत्रिकदृष्ट्या शक्य न झाल्याने महापालिकेने मध्येच शहरातील गावठाण भागात हा भाग जोडून दिला आहे. त्यामुळे शहराच्या उर्वरित भागातील पाणी गावठाण भागात चेंबरमधून उफाळून बाहेर पडते आणि त्याचा त्रास गावठाणातील सखल भागातील नागरिकांना सहन करावा लागतो. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून ही योजना राबवली, परंतु आता त्याचे दोष लक्षात आल्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा केली जात नाही. त्यामुळे गावठाणातील समस्या ‘जैसे थे’ आहे.

टॅग्स :Nashikनाशिक