शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइनचा आग्रह सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:26 IST

नाशिक : गेल्या वर्षी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइनचा आग्रह धरल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणाऱ्या समाजकल्याण विभागाने त्यापासून बोध घेत यंदा विद्यार्थी व महाविद्यालयांना आॅफलाइन अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या असून, आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी अवघे पंधरा दिवस शिल्लक असल्याचे पाहून येत्या दोन दिवसांत तातडीने अर्ज सादर करण्याची मुदत दिली आहे.

ठळक मुद्देदोन दिवसांची मुदतसमाजकल्याण विभागाकडून आॅफलाइन अर्ज करण्याचे आवाहन

नाशिक : गेल्या वर्षी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइनचा आग्रह धरल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणाऱ्या समाजकल्याण विभागाने त्यापासून बोध घेत यंदा विद्यार्थी व महाविद्यालयांना आॅफलाइन अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या असून, आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी अवघे पंधरा दिवस शिल्लक असल्याचे पाहून येत्या दोन दिवसांत तातडीने अर्ज सादर करण्याची मुदत दिली आहे.केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत सन २०१७-१८ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी नूतनीकरण अर्ज व सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन आॅफलाइन अर्ज भरण्याच्या सूचना यापूर्वीच समाजकल्याण विभागाने सर्व महाविद्यालयांना दिल्या होत्या, परंतु सहायक आयुक्त कार्यालयाकडे बहुतांशी महाविद्यालयांनी फक्त नूतनीकरणाचेच अर्ज दाखल केले आहेत. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन नूतनीकरणाचे आॅफलाइन अर्ज काही महाविद्यालयांनी सादर केले नाहीत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांनी १६ मार्चपूर्वी नवीन व नूतनीकरणाचे आॅफलाइन अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठवावेत, असे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त प्राची वाजे यांनी केले आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यास पंधरा दिवस शिल्लक आहेत.सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेंतर्गत लाभ अदा करण्यासाठी सुधारित कार्यपद्धती शासनाने जानेवारीत काढलेल्या आदेशात नमूद असून, त्यानुसार विजाभज, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या केंद्र व राज्य योजनांमधील शंभर टक्के निधी विद्यार्थ्यांना मंजूर करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. जानेवारीच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती प्रवर्गाचे सन २०१७-१८ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांचे नूतनीकरण अर्ज आॅनलाइन प्रणालीद्वारे त्या त्या महाविद्यालयांनी आॅनलाइन पद्धतीने आणि सन २०१७-१८ मधील नवीन आॅफलाइन अर्ज विहित नमुन्यात अचूक माहितीसह सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार १६ मार्चपूर्वी महाविद्यालयांनी सदरचे अर्ज सादर करावेत त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही वाजे यांनी म्हटले आहे.महाविद्यालयांवर जबाबदारीसामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाºया योजनेनुसार कोणीही विद्यार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता महाविद्यालयांनी घ्यावी. जर कोणी विद्यार्थी शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहिल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची राहील, असा इशाराही प्राची वाजे यांनी दिला आहे.