शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइनचा आग्रह सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:26 IST

नाशिक : गेल्या वर्षी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइनचा आग्रह धरल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणाऱ्या समाजकल्याण विभागाने त्यापासून बोध घेत यंदा विद्यार्थी व महाविद्यालयांना आॅफलाइन अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या असून, आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी अवघे पंधरा दिवस शिल्लक असल्याचे पाहून येत्या दोन दिवसांत तातडीने अर्ज सादर करण्याची मुदत दिली आहे.

ठळक मुद्देदोन दिवसांची मुदतसमाजकल्याण विभागाकडून आॅफलाइन अर्ज करण्याचे आवाहन

नाशिक : गेल्या वर्षी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइनचा आग्रह धरल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणाऱ्या समाजकल्याण विभागाने त्यापासून बोध घेत यंदा विद्यार्थी व महाविद्यालयांना आॅफलाइन अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या असून, आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी अवघे पंधरा दिवस शिल्लक असल्याचे पाहून येत्या दोन दिवसांत तातडीने अर्ज सादर करण्याची मुदत दिली आहे.केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत सन २०१७-१८ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी नूतनीकरण अर्ज व सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन आॅफलाइन अर्ज भरण्याच्या सूचना यापूर्वीच समाजकल्याण विभागाने सर्व महाविद्यालयांना दिल्या होत्या, परंतु सहायक आयुक्त कार्यालयाकडे बहुतांशी महाविद्यालयांनी फक्त नूतनीकरणाचेच अर्ज दाखल केले आहेत. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन नूतनीकरणाचे आॅफलाइन अर्ज काही महाविद्यालयांनी सादर केले नाहीत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांनी १६ मार्चपूर्वी नवीन व नूतनीकरणाचे आॅफलाइन अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठवावेत, असे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त प्राची वाजे यांनी केले आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यास पंधरा दिवस शिल्लक आहेत.सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेंतर्गत लाभ अदा करण्यासाठी सुधारित कार्यपद्धती शासनाने जानेवारीत काढलेल्या आदेशात नमूद असून, त्यानुसार विजाभज, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या केंद्र व राज्य योजनांमधील शंभर टक्के निधी विद्यार्थ्यांना मंजूर करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. जानेवारीच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती प्रवर्गाचे सन २०१७-१८ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांचे नूतनीकरण अर्ज आॅनलाइन प्रणालीद्वारे त्या त्या महाविद्यालयांनी आॅनलाइन पद्धतीने आणि सन २०१७-१८ मधील नवीन आॅफलाइन अर्ज विहित नमुन्यात अचूक माहितीसह सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार १६ मार्चपूर्वी महाविद्यालयांनी सदरचे अर्ज सादर करावेत त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही वाजे यांनी म्हटले आहे.महाविद्यालयांवर जबाबदारीसामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाºया योजनेनुसार कोणीही विद्यार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता महाविद्यालयांनी घ्यावी. जर कोणी विद्यार्थी शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहिल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची राहील, असा इशाराही प्राची वाजे यांनी दिला आहे.