शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

पुलाअभावी नागरिकांची गैरसोय

By admin | Updated: September 9, 2016 00:29 IST

ग्रामस्थ संतप्त : सायखेडा-चांदोरी पुलावर बांधणार कमान

कसबे सुकेणे : महाड दुर्घटनेनंतर जाग्या झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि प्रशासनाने गोदावरी नदीवरील सायखेडा पुलावरून अवजड वाहतुकीस कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला छोटी वाहने जातील अशीच कमान बांधण्याचे काम सुरू केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.गोदावरी नदीला आलेला महापूर आणि महाडची दुर्घटना याचा मोठा धसका निफाडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला असून, गेल्या महिनाभरापासून बंद असलेली अवजड वाहतूक आता या पुलावरून कायमस्वरूपी बंद केली जाणार असल्याचे समजते. या पुलाच्या दोन्ही बाजूंनी अवजड वाहने जाऊ नये याकरिता या ठिकाणी कमान टाकली जाणार असून, त्याची उंची आठ फूट असल्याने आठ फुटापेक्षा उंचीची वाहने जाणार नसल्याचा फटका सायखेडा आणि परिसरातील गावातील शेतकऱ्यांना बसणार आहे. पूल गेल्या महिनाभरापूसन बंद असल्याने या गावात बस येणे बंद झाल्याने शिवाय शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. याठिकाणी त्वरित नवा पूल उभारावा नाही तर स्ट्रक्चर आॅडिट करून सध्याचा पूल अवजड वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी अश्पाक शेख, विजय कारे, सुरेश कमानकर, कचेश्वर राजगुरू, उल्हास कदम, राजेंद्र कुटे, सुनील कुटे, सोपान खालकर, नवनाथ पवार, हिरामण शिंदे व नागरिकांनी केली आहे.याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती अश्पाक शेख यांनी दिली.