शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

काम अर्धवट असल्याने गैरसोय

By admin | Updated: August 2, 2016 01:00 IST

ओझर : महामार्ग ओलांडताना नागरिकांचा जीव धोक्यात

ओझर : महामार्गालगत असलेल्या ओझर परिसरातील नागरिकांना वेगवान वाहनांच्या गतीमुळे रस्ता ओलांडणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. अजून किती दिवस ओझरकारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागेल असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी विचारला आहे. अनेक वर्षांपासून अर्धवट असलेले महामार्गाचे काम अद्याप अर्धवट असल्यामुळे हा धोका कायम आहे.ओझर पूर्वी एक गाव होते. परंतु आता आजूबाजूला उदयास आलेली सर्व नगरे पाहता आता ओझर गावाने उपनगराकडे झेप घेतली आहे. यातील शेकडो नागरिक हे महामार्गाच्या दोन्ही बाजूने गावात ये-जा करतात.ओझरची मुख्य वस्ती गावाच्या पलीकडे आहे. त्यामध्ये एरफोर्स स्टेशन आर.के. कॉलनी लोहिया नगर, शिवाजी नगर, संजीवनी नगर, दत्तनगर, रावसाहेब कॉलनी, चौरे मळा आदिंचा समावेश आहे. येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकास महामार्ग ओलांडूनच गावात यावे लागते. सध्या सायखेडा फाटा ते पाटील संकुलपर्यंत जुन्या रस्त्यावरून वाहने ये-जा करतात कारण , इथली जी काही मंजूर कामे आहेत ती लाल फितीत अडकली आहेत. सायखेडा फाटा परिसरात तर रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवायचे की आडव्या जाणाऱ्या वाहनांच्या वेगाचा अंदाज घायचा या विचारांमध्ये वाहनचालक असतात. यामुळे येथे अनेक अपघात झाले आहेत. त्यामध्ये अनेक जीव गेले. यापुढे शेतकऱ्यांची ये-जा असलेले खंडेराव मंदिर परिसर तर सध्या धोकादायक बनले आहे. कारण या मंदिराशेजारी असलेल्या शाळेतील विद्यार्र्थी तर महामार्ग पोलिसांच्या मदतीशिवाय ओलांडूच शकत नाही. तुकाराम कॉम्प्लेक्सजवळ हीच परिस्थिती आहे. गावात मंगळवारी आठवडे बाजार असतो. यासाठी ओसंडून रस्त्यावर ओसंडून गर्दी वाहत असते. वाहनांची भररस्त्यात केलेली पार्कींग अपघाताला आमंत्रण देणारी आहे.काही महिन्यांपूर्वी येथे मोठा अपघात झाला होता. यात मालेगावच्या पाच लोकांना प्राण गमवावे लागले होते. गडाख कॉर्नर परिसरात अशीच परिस्थिती आहे. ओझर गावात सर्वात मोठा दुचाकी वाहनांचा बाजार भरतो. या बाजाराच्या मागे मोठी वसाहत आहे. एरफोर्सला ये-जा करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. पाटील संकुल येथील कामगार थोडे विरु द्ध दिशेस येऊन महामार्ग ओलांडून कामावर जातात. सतत प्रवाशांची रेलचेल असूनही सर्व्हिस रोड पूर्ण झालेला नाही. संपूर्ण जुन्या रस्त्याला तर जागोजागी मोठे खड्डे पडलेले आहेत. अलीकडे वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अजून किती दिवस ओझरकारांनी सहन करावं? महामार्ग प्राधिकरणला अजून जाग कशी आलेली नाही, असा सवाल विचारला जात आहे. (वार्ताहर)