शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

सुगम्य भारत योजनेलाच ‘अपंगत्व’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:56 IST

नाशिक : दिव्यांग व्यक्तींना शासकीय कार्यालयामध्ये येण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने २०१६-१७ मध्ये सुगम्य भारत योजना आणली आहे. मात्र, शासकीय उदासीनतेमुळे अद्यापही शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्प व्यतिरिक्त अन्य सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याने या योजनेलाच ‘अपंगत्व’ आले आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

ठळक मुद्देशासकीय कार्यालयांची उदासीनता : सुविधा फाइलींमध्ये बंद

नाशिक : दिव्यांग व्यक्तींना शासकीय कार्यालयामध्ये येण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने २०१६-१७ मध्ये सुगम्य भारत योजना आणली आहे. मात्र, शासकीय उदासीनतेमुळे अद्यापही शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्प व्यतिरिक्त अन्य सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याने या योजनेलाच ‘अपंगत्व’ आले आहे का? असा सवाल विचारला जात आहे.दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडूनही अनेक योजना राबविल्या जातात. परंतु या योजनांना सक्षमपणे लागू केले जात नसल्यामुळेच शासकीय फाइल्समध्ये बंदिस्त या योजनाच अधू झाल्या असल्याचे वास्तव आहे. अशा मानसिकतेमुळेच अजूनही अपंगांना आपल्या हक्क आणि न्यायासाठी शासनदरबारी मोेर्चे, आंदोलने करावी लागतात.दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळावे यासाठी केंद्र सरकारने अशीच एक ‘सुगम्य भारत योजना’ आणली आहे. या योजनेतील तरतुदींनुसार शासकीय कार्यालये, चित्रपटगृहे, हॉटेल्स, उद्याने, वैद्यकीय उपचार केंद्रे, औषधविक्रीची दुकाने, मॉल्स अशा ठिकाणी दिव्यांगांना जाता यावे यासाठी संबंधित इमारतींना रॅम्प, लिफ्ट, व्हीलचेअर असावे, असे अपेक्षित आहे. शासकीय इमारतींमध्ये या सुविधा पुरविण्यासाठी तर १८ कोटींची तरतूददेखील केंद्र सरकारने केलेली आहे. मात्र या सुविधा अजूनही दृष्टीस पडत नाहीत.अपंगांना दैनंदिन व्यवहारात वावरताना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना सुसह्य अशा सुविधा देण्यासाठी या योजनेत अनेक बारकावे आहेत, परंतु अंमलबाजवणी नसल्यामुळे अपंगांना अजूनही दैनंदिनसुगम्य भारत योजनेलाच ‘अपंगत्व’(पान १ वरून)कामकाजात अनेक अडचणी निर्माण होतात. या प्रकरणाची तर मानवाधिकार आयोगानेदेखील दखल घेतली होती. परंतु त्यानंतरही यंत्रणा फार काही कामाला लागली असे चित्र मात्र दिसू शकलेले नाही. आयोगाच्या असेही निदर्शनास आले आहे की, आजही दिव्यांग व्यक्तींचा विशेष विचार केला जात नाही. सार्वजनिक शौचालये आणि रुग्णालये, चित्रपटगृहांत तर याचा विचार होताना दिसतच नाही. अनेक शासकीय इमारती, चित्रपटगृहे, रुग्णालये येथील शौचालयाचा वापर रुग्णांना करणेही कठीण होते. या प्राथमिक सुविधेचाही विचार इमारतींमध्ये केला जात नसल्याचे वास्तव आहे. सुगम्य भारत ही चांगली योजना असून यामध्ये अपंगांच्या गरजांबाबत बारकाईने विचार करण्यात आलेला आहे. मात्र योजना अंमलबजावणीचा धाक नसल्यामुळे शासकीय आणि सार्वजनिक व्यवस्थेची अपंगांविषयीची निर्ममता नेहमीच समोर येते. शहरातील शासकीय इमारतींमध्येही अपंगांची गैरसोयनाशिक शहरातील आदिवासी विकास, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, बांधकाम विभाग, समाजकल्याण अशा अनेक शासकीय कार्यालयांमध्ये वरच्या मजल्यांवर जाण्यासाठी अपंगांना कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. व्हीलचेअर तर कुठेच दिसत नाही. चित्रपटगृहांमध्ये तर या सुविधांचा विचारही केलेला दिसत नाही.