शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

भाविकांची वाहतूक महासंचालकांच्या दारी

By admin | Updated: March 26, 2015 23:52 IST

कुंभमेळा : वाहतूक नियोजनात शहर पोलिसांचा खोडा; आयोजनात सारेच आलबेल नाही

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या त्र्यंबकेश्वर येथील पर्वणीसाठी येऊ पाहणाऱ्या भाविकांना नाशिकला वळसा घालून वळणमार्गे त्र्यंबकेश्वरकडे रवाना करण्यासाठी जिल्हा प्रशासन व ग्रामीण पोलीस यंत्रणेने तयार केलेल्या वाहतूक नियोजन आराखड्यात शहर पोलिसांनी खोडा घातल्यामुळे निर्माण झालेला पेचप्रसंग थेट पोलीस महासंचालकांच्या दारीच सोडविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कुंभमेळ्याच्या आयोजनात सारेच काही आलबेल असल्याचे मानण्याचे कारण नाही. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाचा सर्वच संबंधित खात्यांचा अंतिम टप्पा सुरू झाला असून, त्यांनी आजवर केलेल्या कामांचे सूक्ष्म नियोजन व त्याची अंमलबजावणीवरच आता भर दिला जात आहे. त्यामुळे दर सप्ताहात होणाऱ्या आढावा बैठकीत प्रत्येक विभागाचे सादरीकरण व त्यावरील अडचणींची चर्चा होऊन तत्काळ मार्ग काढण्यावर भर दिला जात आहे. कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी अधिक महत्त्व असल्याने व याच दिवशी भाविकांची संख्या लाखोंच्या घरात जात असल्याने विशेष करून त्र्यंबकेश्वरच्या पर्वणीसाठी बाहेरगावाहून व त्यातल्या त्यात औरंगाबाद, पुणे, धुळे व मुंबईकडून खासगी वाहनांनी येणाऱ्या भाविकांना नाशिकमध्ये न येऊ देता, नाशिकला वळसा घालून पर्यायी मार्गाने त्र्यंबकेश्वरकडे वळविण्याचा आराखडा ग्रामीण पोलिसांनी तयार केला. या आराखड्यानुसार त्र्यंबकेश्वरकडे जाण्यासाठी अधिकाधिक आडमार्गाचा वापर करून, एकाच रस्त्यावर वाहतुकीचा ताण पडणार नाही याची काळजी घेण्याबरोबरच रस्त्याची परिस्थिती व त्यामार्गे येणाऱ्या वाहनांची अंदाजित संख्या, असे गणितही मांडण्यात आले. यातील काही रस्ते एकेरी वाहतुकीसाठी ठेवण्यात येणार आहेत. गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यापेक्षा यंदा नाशिक-त्र्यंबकरोड चौपदरी झाल्यामुळे या रस्त्याच्या वापराने वाहतुकीची मोठी कोंडी सोडण्यास मदतच होणार असल्याने अधिकाधिक या रस्त्याचा वापर करून घेण्याचेही नियोजन ग्रामीण पोलिसांनी केले. नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या दोन्ही पर्वण्या एकाच दिवशी असल्यामुळे साहजिकच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे एकाच वेळी भाविकांची गर्दी वाढणार आहे, अशा परिस्थितीत फक्त त्र्यंबकेश्वरला जाऊ पाहणाऱ्या भाविकांची गर्दी परस्पर वळविण्याशिवाय पर्यायच नाही, परंतु ती वळवताना उपलब्ध रस्त्यांची क्षमतादेखील महत्त्वाची असल्याचे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे.कुंभमेळ्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आलेले असताना शहर पोलिसांनी घेतलेल्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे भाविकांच्या वाहतुकीचा प्रश्न ग्रामीण पोलिसांना सोडून द्यावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या साप्ताहिक आढावा बैठकीत विभागीय आयुक्तांपुढे हा प्रश्न काढण्यात आला, तत्पूर्वी ज्यावेळी ग्रामीण पोलिसांनी वाहतूक वळविण्याचा आराखडा सादर केला त्यावेळी मात्र शहर पोलिसांनी कोणतीही हरकत घेतली नसल्याची बाबही यावेळी चर्चिली गेली; परंतु आता मात्र त्याला होणारा विरोध पाहता, या संदर्भात थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांचेच मत मागविण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी केली. त्यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांचे याबाबत असलेले दावे-प्रतिदावे मागविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)