शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

भाविकांची वाहतूक महासंचालकांच्या दारी

By admin | Updated: March 26, 2015 23:52 IST

कुंभमेळा : वाहतूक नियोजनात शहर पोलिसांचा खोडा; आयोजनात सारेच आलबेल नाही

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या त्र्यंबकेश्वर येथील पर्वणीसाठी येऊ पाहणाऱ्या भाविकांना नाशिकला वळसा घालून वळणमार्गे त्र्यंबकेश्वरकडे रवाना करण्यासाठी जिल्हा प्रशासन व ग्रामीण पोलीस यंत्रणेने तयार केलेल्या वाहतूक नियोजन आराखड्यात शहर पोलिसांनी खोडा घातल्यामुळे निर्माण झालेला पेचप्रसंग थेट पोलीस महासंचालकांच्या दारीच सोडविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कुंभमेळ्याच्या आयोजनात सारेच काही आलबेल असल्याचे मानण्याचे कारण नाही. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाचा सर्वच संबंधित खात्यांचा अंतिम टप्पा सुरू झाला असून, त्यांनी आजवर केलेल्या कामांचे सूक्ष्म नियोजन व त्याची अंमलबजावणीवरच आता भर दिला जात आहे. त्यामुळे दर सप्ताहात होणाऱ्या आढावा बैठकीत प्रत्येक विभागाचे सादरीकरण व त्यावरील अडचणींची चर्चा होऊन तत्काळ मार्ग काढण्यावर भर दिला जात आहे. कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी अधिक महत्त्व असल्याने व याच दिवशी भाविकांची संख्या लाखोंच्या घरात जात असल्याने विशेष करून त्र्यंबकेश्वरच्या पर्वणीसाठी बाहेरगावाहून व त्यातल्या त्यात औरंगाबाद, पुणे, धुळे व मुंबईकडून खासगी वाहनांनी येणाऱ्या भाविकांना नाशिकमध्ये न येऊ देता, नाशिकला वळसा घालून पर्यायी मार्गाने त्र्यंबकेश्वरकडे वळविण्याचा आराखडा ग्रामीण पोलिसांनी तयार केला. या आराखड्यानुसार त्र्यंबकेश्वरकडे जाण्यासाठी अधिकाधिक आडमार्गाचा वापर करून, एकाच रस्त्यावर वाहतुकीचा ताण पडणार नाही याची काळजी घेण्याबरोबरच रस्त्याची परिस्थिती व त्यामार्गे येणाऱ्या वाहनांची अंदाजित संख्या, असे गणितही मांडण्यात आले. यातील काही रस्ते एकेरी वाहतुकीसाठी ठेवण्यात येणार आहेत. गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यापेक्षा यंदा नाशिक-त्र्यंबकरोड चौपदरी झाल्यामुळे या रस्त्याच्या वापराने वाहतुकीची मोठी कोंडी सोडण्यास मदतच होणार असल्याने अधिकाधिक या रस्त्याचा वापर करून घेण्याचेही नियोजन ग्रामीण पोलिसांनी केले. नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या दोन्ही पर्वण्या एकाच दिवशी असल्यामुळे साहजिकच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे एकाच वेळी भाविकांची गर्दी वाढणार आहे, अशा परिस्थितीत फक्त त्र्यंबकेश्वरला जाऊ पाहणाऱ्या भाविकांची गर्दी परस्पर वळविण्याशिवाय पर्यायच नाही, परंतु ती वळवताना उपलब्ध रस्त्यांची क्षमतादेखील महत्त्वाची असल्याचे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे.कुंभमेळ्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आलेले असताना शहर पोलिसांनी घेतलेल्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे भाविकांच्या वाहतुकीचा प्रश्न ग्रामीण पोलिसांना सोडून द्यावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या साप्ताहिक आढावा बैठकीत विभागीय आयुक्तांपुढे हा प्रश्न काढण्यात आला, तत्पूर्वी ज्यावेळी ग्रामीण पोलिसांनी वाहतूक वळविण्याचा आराखडा सादर केला त्यावेळी मात्र शहर पोलिसांनी कोणतीही हरकत घेतली नसल्याची बाबही यावेळी चर्चिली गेली; परंतु आता मात्र त्याला होणारा विरोध पाहता, या संदर्भात थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांचेच मत मागविण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी केली. त्यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांचे याबाबत असलेले दावे-प्रतिदावे मागविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)