शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

दिशादर्शक फलक झाडांच्या आड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:20 IST

शहरात नव्याने येणाऱ्या प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी पालिका प्रशासनाकडून शहरातील प्रत्येक रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. मात्र शहरातील मुख्य भागातील रस्त्यावरील फलकांना झाडांच्या फांद्यांनी झाकाळले आहे.

नाशिक : शहरात नव्याने येणाऱ्या प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी पालिका प्रशासनाकडून शहरातील प्रत्येक रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. मात्र शहरातील मुख्य भागातील रस्त्यावरील फलकांना झाडांच्या फांद्यांनी झाकाळले आहे. त्यामुळे कुठला मार्ग कोठे जातो हे सुद्धा फलकांवर दिसत नसल्यामुळे प्रवाशांची दिशाभूल होत आहे, तर काही प्रवासी भररस्त्यातच आपले वाहने थांबवत फलक वाचण्याचा प्रयत्न करत आहे.प्रवाशांना रस्ता माहीत नसल्यावर कुणालातरी विचारत आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यास मोठी अडचण निर्माण होत असते. त्यात मोठ्या शहरांमध्ये अनेकांची वेगवेगळ्या मार्गांमुळे फसगत होत असते. त्यामुळे चुकीने प्रवासी एखाद्या वेगळ्याच ठिकाणी पोहचत असतो. त्यामुळे शहारामध्ये नव्याने येणाºया प्रवाशांना कुठला मार्ग कोठे जातो व कुठून जातो हे कळण्यासाठी महापालिकेकडून शहरातील प्रत्येक मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. मात्र हे फलक रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या बेसुमार वाढलेल्या फांद्यामुळे झाकाळले गेले आहे. त्यामुळे या फलकांवर मार्गाच्या माहितीविषयी काहीच दिसत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांची एकप्रकारची दिशाभूलच होत आहे. शहरातील मुख्य भागांत असलेल्या या फलकांनाच झाडांच्या फांद्यांनी झाक ळले असल्यामुळे याचा फटका प्रवाशांना होताना दिसतो. त्यामुळे पालिकेने अशा फलकांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.झाडांची बेसुमार वाढशहरातील मुख्य रस्ता असलेला जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील पिनॅकल मॉल, त्र्यंबकनाका भागातील फलकांना मार्गाच्या कडेला असलेल्या झाडांची बेसुमार वाढ झालेली आहे. त्यामुळे झाडांच्या फांद्यामुळे येथील दिशादर्शक फलक झाकाळले गेले आहे. तसेच सारडा सर्कल, गंगापूररोड, पंपिंगरोड भागांतील फलकांची दुरवस्था झाली आहे. याचा फटका शहरात नव्याने येणाºया प्रवाशांना बसला आहे. त्यामुळे अशा फलकांची सुधारणा व बेसुमार वाढलेल्या झाडांची तोड करणे गरजेचे आहे.त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी शहरातून एकमेव मार्ग असल्याचे माहीत होते.पालिकेने अशा फलकांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र शहरात येण्याचा फारसा प्रसंग येत नसल्यामुळे त्र्यंबकेश्वरला जाणारा मुख्य मार्ग माहीत नव्हता त्यात त्र्यंबकरोड नाक्यावर आल्यावर येथील फलक व्यवस्थित न दिसल्यामुळे चुकीने गर्दीच्या मार्गाने जावे लागले. त्यामुळे रिक्षाचालकाला विचारत पुन्हा फिरून मुख्य मार्गाला यावे लागले.- नितीन पाटाळे, प्रवासी

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी