शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दिशादर्शक फलक झाडांच्या आड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:20 IST

शहरात नव्याने येणाऱ्या प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी पालिका प्रशासनाकडून शहरातील प्रत्येक रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. मात्र शहरातील मुख्य भागातील रस्त्यावरील फलकांना झाडांच्या फांद्यांनी झाकाळले आहे.

नाशिक : शहरात नव्याने येणाऱ्या प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी पालिका प्रशासनाकडून शहरातील प्रत्येक रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. मात्र शहरातील मुख्य भागातील रस्त्यावरील फलकांना झाडांच्या फांद्यांनी झाकाळले आहे. त्यामुळे कुठला मार्ग कोठे जातो हे सुद्धा फलकांवर दिसत नसल्यामुळे प्रवाशांची दिशाभूल होत आहे, तर काही प्रवासी भररस्त्यातच आपले वाहने थांबवत फलक वाचण्याचा प्रयत्न करत आहे.प्रवाशांना रस्ता माहीत नसल्यावर कुणालातरी विचारत आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यास मोठी अडचण निर्माण होत असते. त्यात मोठ्या शहरांमध्ये अनेकांची वेगवेगळ्या मार्गांमुळे फसगत होत असते. त्यामुळे चुकीने प्रवासी एखाद्या वेगळ्याच ठिकाणी पोहचत असतो. त्यामुळे शहारामध्ये नव्याने येणाºया प्रवाशांना कुठला मार्ग कोठे जातो व कुठून जातो हे कळण्यासाठी महापालिकेकडून शहरातील प्रत्येक मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. मात्र हे फलक रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या बेसुमार वाढलेल्या फांद्यामुळे झाकाळले गेले आहे. त्यामुळे या फलकांवर मार्गाच्या माहितीविषयी काहीच दिसत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांची एकप्रकारची दिशाभूलच होत आहे. शहरातील मुख्य भागांत असलेल्या या फलकांनाच झाडांच्या फांद्यांनी झाक ळले असल्यामुळे याचा फटका प्रवाशांना होताना दिसतो. त्यामुळे पालिकेने अशा फलकांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.झाडांची बेसुमार वाढशहरातील मुख्य रस्ता असलेला जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील पिनॅकल मॉल, त्र्यंबकनाका भागातील फलकांना मार्गाच्या कडेला असलेल्या झाडांची बेसुमार वाढ झालेली आहे. त्यामुळे झाडांच्या फांद्यामुळे येथील दिशादर्शक फलक झाकाळले गेले आहे. तसेच सारडा सर्कल, गंगापूररोड, पंपिंगरोड भागांतील फलकांची दुरवस्था झाली आहे. याचा फटका शहरात नव्याने येणाºया प्रवाशांना बसला आहे. त्यामुळे अशा फलकांची सुधारणा व बेसुमार वाढलेल्या झाडांची तोड करणे गरजेचे आहे.त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी शहरातून एकमेव मार्ग असल्याचे माहीत होते.पालिकेने अशा फलकांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र शहरात येण्याचा फारसा प्रसंग येत नसल्यामुळे त्र्यंबकेश्वरला जाणारा मुख्य मार्ग माहीत नव्हता त्यात त्र्यंबकरोड नाक्यावर आल्यावर येथील फलक व्यवस्थित न दिसल्यामुळे चुकीने गर्दीच्या मार्गाने जावे लागले. त्यामुळे रिक्षाचालकाला विचारत पुन्हा फिरून मुख्य मार्गाला यावे लागले.- नितीन पाटाळे, प्रवासी

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी