शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

आंदोलनाची दिशा लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:16 IST

-------- एकेकाळी महाराष्ट्राचे नेतृत्व करणारा मराठा समाज सर्वच क्षेत्रात उपेक्षित झाला आहे. ठाकरे सरकारने यासंदर्भात घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाने ...

--------

एकेकाळी महाराष्ट्राचे नेतृत्व करणारा मराठा समाज सर्वच क्षेत्रात उपेक्षित झाला आहे. ठाकरे सरकारने यासंदर्भात घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरविला होता. सर्वोच्च न्यायालयाने मात्र तो नाकारला आहे. त्यामुळे कदाचित यापुढची लढाई रस्त्यावर उतरून लढावी लागेल.

- अजय बोरस्ते, माजी महानगरप्रमुख, सेना

---------

न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे. यात राज्य सरकारचीच चूक दिसते. ज्या प्रमाणात पाठपुरावा करायला हवा होता तो केला नाही. सरकार कमी पडले. आता चारही बाजूचे रस्ते बंद झाल्याने समाजाला दुसरा विचार करावा लागेल. लवकरच येत्या दोन दिवसांत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

- शैलेश कुटे, मराठा समाज समन्वयक

---------

न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे. आता महाराष्ट्र सरकारने समाजाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे आपला अहवाल द्यावा व केंद्राने त्यावर सकारात्मक निर्णय घेऊन राष्ट्रपतींकडे पाठवावे. तसेच या निकालाविरुद्ध सरकारने रिव्हू रिट पिटिशन दाखल करून समाजाची उपेक्षा होणार नाही, याची काळजी घ्यावी.

- डॉ. हेमलता पाटील, काँग्रेस प्रवक्त्या

--------

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत. कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही. मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण रद्द केले असले तरी समाजाने संयम बाळगणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द

ठरवल्यामुळे आता काहीतरी मार्ग काढणे गरजेचे आहे.

-डॉ.अपूर्व हिरे, माजी आमदार

---------

सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आघाडी सरकार अपयशी ठरली आहे. सरकारने समाजाची फसवणूक केली. दीड वर्षात अनेक तारखांना वकील हजर राहिले नव्हते, कागदपत्रे उपलब्ध नव्हते, बेजबाबदार पद्धतीने केस हाताळण्यात आली. त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांपुढे अंधार निर्माण झाला आहे. समाज सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

- सीमा हिरे, आमदार, भाजपा