शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

आंदोलनाची दिशा लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:16 IST

-------- एकेकाळी महाराष्ट्राचे नेतृत्व करणारा मराठा समाज सर्वच क्षेत्रात उपेक्षित झाला आहे. ठाकरे सरकारने यासंदर्भात घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाने ...

--------

एकेकाळी महाराष्ट्राचे नेतृत्व करणारा मराठा समाज सर्वच क्षेत्रात उपेक्षित झाला आहे. ठाकरे सरकारने यासंदर्भात घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरविला होता. सर्वोच्च न्यायालयाने मात्र तो नाकारला आहे. त्यामुळे कदाचित यापुढची लढाई रस्त्यावर उतरून लढावी लागेल.

- अजय बोरस्ते, माजी महानगरप्रमुख, सेना

---------

न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे. यात राज्य सरकारचीच चूक दिसते. ज्या प्रमाणात पाठपुरावा करायला हवा होता तो केला नाही. सरकार कमी पडले. आता चारही बाजूचे रस्ते बंद झाल्याने समाजाला दुसरा विचार करावा लागेल. लवकरच येत्या दोन दिवसांत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

- शैलेश कुटे, मराठा समाज समन्वयक

---------

न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे. आता महाराष्ट्र सरकारने समाजाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे आपला अहवाल द्यावा व केंद्राने त्यावर सकारात्मक निर्णय घेऊन राष्ट्रपतींकडे पाठवावे. तसेच या निकालाविरुद्ध सरकारने रिव्हू रिट पिटिशन दाखल करून समाजाची उपेक्षा होणार नाही, याची काळजी घ्यावी.

- डॉ. हेमलता पाटील, काँग्रेस प्रवक्त्या

--------

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत. कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही. मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण रद्द केले असले तरी समाजाने संयम बाळगणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द

ठरवल्यामुळे आता काहीतरी मार्ग काढणे गरजेचे आहे.

-डॉ.अपूर्व हिरे, माजी आमदार

---------

सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आघाडी सरकार अपयशी ठरली आहे. सरकारने समाजाची फसवणूक केली. दीड वर्षात अनेक तारखांना वकील हजर राहिले नव्हते, कागदपत्रे उपलब्ध नव्हते, बेजबाबदार पद्धतीने केस हाताळण्यात आली. त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांपुढे अंधार निर्माण झाला आहे. समाज सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

- सीमा हिरे, आमदार, भाजपा