शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

दिंडोरीत महिलाही उतरल्या रस्त्यावर

By admin | Updated: June 4, 2017 01:42 IST

दिंडोरी तालुक्यातील शेतकरी महिलांनी सकाळी ९ वाजता नाशिक गुजरात राज्य मार्ग पालखेड चौफुली येथे रोखला

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : सरकारने सरसकट कर्जमाफी न देता अल्प भूधारक व मोठे शेतकरी यांच्यात फूट पाडून शेतकरी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी रात्री उशिरा काही शेतकरी संघटनांना हाताशी धरून जो निर्णय घेतला त्याचा निषेध करत दिंडोरी तालुक्यातील शेतकरी महिलांनी सकाळी ९ वाजता नाशिक गुजरात राज्य मार्ग पालखेड चौफुली येथे रोखला. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी पालखेड चौफुली येथे आंबे, टमाटा ओतून सरकारचा निषेध केला. यावेळी साक्षी राजे यांनी सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे, असे सांगितले. संगीता सातपुते यांनी सरकार वेळ काढूपणा करत असून, फक्त आश्वासनांचे गाजर दाखवत आहे. शेतकरी अशा फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाही, असे सांगितले. यावेळी अनेक माहिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. ज्योती देशमुख, चारुशीला राजे, नगरसेविका मालती जाधव, सविता देशमुख, क्षितिजा राजे, साक्षी राजे, संगीता देशमुख, पुष्पा देशमुख, माया कुलकर्णी, मीरा जाधव, जयश्री सातपुते आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना आसमानी व सुलतानी संकटाना सामोरे जावे लागले त्यामुळे त्याने काढलेल्या कर्जात वाढ झाली, एकाही भाजीपाला पिकाला भाव मिळाला नाही. त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या मुलींनाही आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. जर सरसकट कर्जमाफी दिली नाही तर आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू, असा निर्धार लता बोरस्ते यांनी व्यक्त केला.प्रथमच महिला रस्त्यावरदिंडोरीत आज ऐतिहासिक घटना घडली. राजकीय पक्षाच्या आंदोलनात दोन चार महिला उपस्थित राहतात, मात्र आज सकाळी ८ वाजेपासूनच येथील महिलांनी चूल, मूल बाजूला ठेवत आंदोलन केले. आंदोलनात तीनशे ते चारशे महिला स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्या होत्या.दिंडोरीत वाहतूक ठप्पपालखेड चौफुलीवर महिलांनी आंदोलन सुरु केल्याने नाशिक, कळवण, वणी, सापुतारा, सुरत येथे ये-जा करणाऱ्या वाहतुकीवर झाला. सुमारे एक तास आंदोलन सुरु असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पालखेड चौफुलीवर लाल चिखल : संतप्त महिलांनी पालखेड चौफुलीवर आंबे व टमाटा फेकल्यामुळे रस्त्यावर लाल चिखल निर्माण झाला होता. त्यामुळे दुचाकीचालकांची वाहने घसरत होती. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यांची सफाई केली.