शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

दिंडोरी तालुक्याला पावसाचा जोरदार तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 19:31 IST

दिंडोरी : शहर व तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून पावसाचे आगमनाने पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस असल्याने अद्याप धरणसाठ्यात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही.

ठळक मुद्देपश्चिम भागातील धरणांचे पाणलोट क्षेत्रात मात्र अल्प पाऊस झाल्याने अद्याप धरण पाणीसाठा जैसे थे

दिंडोरी : शहर व तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून पावसाचे आगमनाने पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस असल्याने अद्याप धरणसाठ्यात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही.दिंडोरी तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पेरण्या खोळंबल्या होत्या व झालेल्या पेरण्या व भाजीपाला लागवड पावसाअभावी वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र शुक्र वारी (दि.१९) सायंकाळी व रात्री खेडगाव कादवा कारखाना मातेरेवाडी, लोखंडेवाडी, जोपुळ, जानोरी, मोहाडी तळेगाव, खतवड दिंडोरी भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मात्र पावसाचे माहेरघर समजल्या जाणाºया पश्चिम भागातील धरणांचे पाणलोट क्षेत्रात मात्र अल्प पाऊस झाल्याने अद्याप धरण पाणीसाठा जैसे थे आहे.पूर्व भागात विविध ओहोळ, नाल्यांना पूर आला तरी शनिवारी (दि.२०) निळवंडी पाडे, हातनोरे, मडकीजांब जंबुटके परिसरात चांगला पाऊस झाल्याने कोळवन व धामण नदीलाही पूर आल्याने पालखेड धरणात पाणीसाठा वाढत आहे.शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली पुन्हा एक दोन तासाने ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. जोपुळ, धामणवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने धामणवाडी येथील ओहोळाला मोठा पूर आला. त्यामुळे जोपुळ पिंपळगाव रस्त्यावर पाणी आले, परिणामी बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान येथे पुलाची आवश्यकता असताना फरशी करण्यात आल्याने रस्त्यावर पाणी आले आहे.या पावसाने जोपुळ येथील पाझरतलावात चांगले पाणी साचले असून, दिंडोरी शहरात निळवंडी रोडवर जुन्या पंचायत समिती प्रवेशद्वारापुढे देखिल पाणीच पाणी झाले आहे.रस्त्याची गुणवत्ता उघडदिंडोरी, पालखेड, लोखंडेवाडी, जोपुळ, पिंपळगाव तसेच लखमापूर, कादवा कारखाना, खेडगाव रस्त्याचे नुकतेच नूतनीकरण झाले. मात्र सदर रस्त्याच्या गुणवत्तेबाबत तक्र ारी होत्या. त्यातच काही ठिकाणी सिलकोट करणे बाकी राहिल्याने सदर रस्ता पावसात उखडून गेला असून पुन्हा खड्डे पडू लागले आहे.जोपुळ पिंपळगाव रस्त्यावर धामणवाडी येथे यापूर्वी अनेकवेळा रस्त्यावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे रस्ता नूतनीकरण होताना पूल होणे गरजेचे होते मात्र बांधकाम विभागाने येथे पुला ऐवजी फरशी टाकत छोटे पाईप टाकले.त्यामुळे पुराचे पाणी रस्त्यावर आले व जनतेला त्रास होत असून रस्त्याचेही नुकसान झाले आहे. येथे पूल होणे गरजेचे आहे.- महेंद्र पगार, धामणवाडी.