शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

दिगंबरच्या खालशांचा वाद मिटला

By admin | Updated: August 27, 2015 00:13 IST

दिगंबर आखाडा बैठक : महंत गंगादास यांची मध्यस्थी

पंचवटी : मागील तीन दिवसांपासून दिगंबर आखाड्याने बहिष्कृत केलेले तीन खालसे व आखाडा यांच्यात चतु:संप्रदायाच्या ध्वजावरून रंगलेल्या वादाला दिगंबर आखाड्याच्या महंत व बहिष्कृत केलेल्या खालशाच्या महंतांनी अखेर पूर्णविराम दिल्याने आखाडा व खालशांत सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. दिगंबर आखाड्यात झालेल्या महंत व बहिष्कृत खालशाचे महंत यांच्यात वाद मिटविण्यासाठी नेमण्यात आलेल्या ११ जणांच्या समितीच्या माध्यमातून हा वाद मिटविण्यात आला. त्यानंतर बहिष्कृत केलेल्या खालशाचे महंत व दिगंबर आखाड्यांच्या महंतांनी जय सीताराम, हनुमानाचा जयघोष करीत एकमेकांची गळाभेट घेऊन आपापसातील मतभेद विसरून पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. दिगंबर आखाडा जगन्नाथपुरीचे महंत गंगादास यांच्या मध्यस्थीने या वादावर पडदा पडला आहे. चतु:संप्रदायच्या ध्वजावरून, तसेच महंतांचा अपमान केल्याच्या कारणावरून दिगंबर आखाड्याचे महंत व खालसे यांच्यात वाद निर्माण झाला होता. याच वादातून दिगंबर आखाड्याच्या महंतांनी बैठक घेऊन महात्यागी कॅम्पच्या महंत सीतारामदास, डाकोरचे महंत माधवाचार्य व तेराभाई त्यागीचे महंत बृजमोहनदास यांच्या खालशांवर बहिष्कार टाकत त्यांना शाहीस्नानाला बरोबर न नेण्याची भूमिका घेतली होती. आखाडा व खालशाचे महंत यापैकी कोणीही माघार घ्यायला तयार नसल्याने दिवसेंदिवस वाद वाढतच चालला होता. आखाडा व बहिष्कृत खालशांचे वाद मिटावे, यासाठी बुधवारी सकाळी दिगंबर आखाड्यात बैठक घेण्यात येऊन ११ खालशांच्या सदस्यांची समिती नेमण्यात आली व त्या समितीच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुपारी दिगंबर आखाड्याचे महंत कृष्णदास, महंत रामकिशोरदासशास्त्री, जगन्नाथपुरीचे महंत गंगादास, भक्तिचरणदास तसेच बहिष्कृत केलेल्या खालशांचे महंत बृजमोहनदास, माधवाचार्य व रामदासत्यागी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी आखाडा व खालशांच्या महंतांनी आपापसातील वाद चव्हाट्यावर आणू नयेत, जे झाले ते झाले आता वाद होणार नाही, अशी भूमिका घेत हनुमानाचा जयघोष करीत वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले. काही चुकांमुळे गैरसमज होऊन वाद निर्माण झाले होते; मात्र यापुढे असे होणार नाही असे गंगादास यांनी सांगितले. वाद मिटविण्यासाठी सनकादिकाचार्य, माधोदास, रामभूषणदास, रामस्वरूपदास, लक्ष्मणदास, रघुवंशभूषण, गोकुळदास, गणेशदास, प्रभुदास, अखलेश्वर आदि महंतांची समिती स्थापन करण्यात आली होती. (वार्ताहर)