शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

दिगंबर आखाड्याचा चौथरा हटविला

By admin | Updated: February 23, 2016 00:18 IST

तपोवनातील प्रकार : साधू-महंतांसह भाविक संतप्त

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील आरक्षित जागेवर दिगंबर आखाड्याने चरणपादुकांसाठी उभारलेल्या चौथऱ्याचे बांधकाम हटविल्याने साधू-महंतांसह भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. दोन दिवसांपूर्वी या चौथऱ्याचे बांधकाम हटविले असून, ते बांधकाम मनपा प्रशासनाने की अन्य कोणी हटविले याबाबत स्पष्टोक्ती नाही; परंतु सदरच्या चौथऱ्याचे बांधकाम हे मनपा प्रशासनानेच केले होते व नंतर मनपानेच हटविल्याचा आरोप साधू-महंतांसह भाविकांनी केला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत दिगंबर, निर्वाणी व निर्माेही अशा तिन्ही आखाड्यांनी चरणपादुका स्थापन करण्यासाठी प्रशासनाकडून मिळालेल्या जागेवर चौथरे उभारले होते. कुंभमेळा आटोपल्यानंतर या चरणपादुकांच्या ठिकाणी देवदेवतांच्या मूर्ती उभारल्या होत्या व त्या मूर्तींचा पूजाविधी व देखभालीची जबाबदारी साधू-महंतांकडे दिली होती. दिगंबर आखाड्यानेदेखील चरणपादुकांसाठी चौथरा बांधला होता; मात्र दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता चौथरा हटविण्याचे काम केले. सध्या तपोवनातील मुरूम उचलण्याचे तसेच शेतजमिनी सपाटीकरणाचे काम सुरू असून, ते काम करतानाच चौथरा हटविला असावा असे बोलले जात आहे. सध्या तपोवनात निर्वाणी व निर्माेही या आखाड्यांच्या चरणपादुकांसाठी असलेले चौथरे व्यवस्थित आहेत; मात्र केवळ दिगंबर आखाड्याच्या चरणपादुकांचा चौथरा हटविल्याने संताप व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)