शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन केंद्रास खोडा

By admin | Updated: November 30, 2015 23:06 IST

दिरंगाई : नोकर भरतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पडून; अग्निशमन केंद्र बंदच

भगूर:नगरपालिकेने ५० लाख रुपये खर्च करून वर्षभरापूर्वी उभारलेल्या अग्निशमन केंद्राकरिता जिल्हा प्रशासनाकडे अधिकारी-कर्मचारी भरतीचा पाठवलेला प्रस्ताव अद्यापही धूळखात पडून असल्याने केवळ कर्मचारी नसल्यामुळे अग्निशमन केंद्र सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे नगरपालिकेचे लाखो रुपये वाया जात असून, अग्निशमन केंद्र बंद अवस्थेत पडून आहे.भगूर गावात आग लागल्यास किंवा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास छावणी परिषद, साऊथ एअरफोर्स, देवळाली, नाशिकरोड अग्निशमन दलाला पाचारण करावे लागते. संबंधित अग्निशमन दलाचे बंब येण्यास वेळ लागत असल्याने दुर्घटनेचे गांभीर्य वाढण्याची शक्यता असते. मात्र या संवेदनशील प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने भगूरकरांमध्ये तीव्र नाराजी आहे. भगूर नगरपालिकेने अग्निशमन केंद्राचे महत्त्व लक्षात घेऊन २०१३ मध्ये १८ लाख रुपये खर्च करून अग्निशमन बंब खरेदी केला. तसेच ३४ लाख रुपये खर्च करून मोठ्या गणपती मंदिराजवळ अग्निशमन सेवा केंद्र व कामगारांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली. आग विझविण्यासाठी व आपत्कालीन परिस्थितीत लागणारे सर्व साहित्यदेखील खरेदी करण्यात आले आहे. नगरपालिकेने रहिवाशांच्या घरपट्टीमध्ये अग्निशमन करही समाविष्ट करून वसुली सुरू केली आहे.भगूर नगरपालिकेत अग्निशमन केंद्र व इतर विभागाची १७ ते १८ पदे रिक्त असून, वर्षभरापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे नगरपालिकेने कामगार भरतीचा प्रस्ताव पाठविला आहे. अग्निशमन केंद्रासाठी १ अधीक्षक, चालक व चार फायरमन अशा सहा जागांची भरती करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून वारंवार तारीख पे तारीख देत नोकर भरतीचा प्रस्ताव रेटून नेला जात आहे. अशी परिस्थिती केवळ भगूर नगरपालिकेबाबतची नव्हे तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेसंदर्भात असल्याचेदेखील समजते. त्र्यंबक पालिकेने पाठविलेल्या कामगार भरतीचा प्रस्ताव रेंगाळलेला आहे. जिल्हा प्रशासनाकडे भगूर नगरपालिकेच्या कामगार भरतीचा प्रस्तावदेखील धूळखात पडून असल्याने ५० लाख रुपये खर्च करून उभारलेले अग्निशमन केंद्र व बंब हे एक प्रकारे शोभेची वस्तू ठरली आहे. नगरपालिकेने जिल्हा प्रशासनाकडे वर्षभरात अनेकवेळा नोकरभरतीच्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा केला आहे. मात्र अद्यापही नोकरीभरती प्रस्तावाच्या फाईलवरील धूळ ‘जैसे थे’च आहे. भगूर पालिकेला आदर्श नगरपालिकेचा पुरस्कार मिळाल्यानंतर पालिकेसाठी अग्निशमन केंद्र असावे असा विचार पुढे आला आणि त्यासाठीची महाराष्ट्र शासनाकडून तरतूदही करण्यात आली. सुमारे ८० लाख निधी मिळाल्यानंतर युद्धपातळीवर अग्निशमन इमारतीचे काम आणि वाहन खरेदी करण्यात आली. मात्र सर्व सज्जता असतानाही केवळ मनुष्यबळ नसल्याने अग्निशमन केंद्र असून नसल्यासारखे आहे.