शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

अग्निशमन केंद्रास खोडा

By admin | Updated: November 30, 2015 23:06 IST

दिरंगाई : नोकर भरतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पडून; अग्निशमन केंद्र बंदच

भगूर:नगरपालिकेने ५० लाख रुपये खर्च करून वर्षभरापूर्वी उभारलेल्या अग्निशमन केंद्राकरिता जिल्हा प्रशासनाकडे अधिकारी-कर्मचारी भरतीचा पाठवलेला प्रस्ताव अद्यापही धूळखात पडून असल्याने केवळ कर्मचारी नसल्यामुळे अग्निशमन केंद्र सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे नगरपालिकेचे लाखो रुपये वाया जात असून, अग्निशमन केंद्र बंद अवस्थेत पडून आहे.भगूर गावात आग लागल्यास किंवा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास छावणी परिषद, साऊथ एअरफोर्स, देवळाली, नाशिकरोड अग्निशमन दलाला पाचारण करावे लागते. संबंधित अग्निशमन दलाचे बंब येण्यास वेळ लागत असल्याने दुर्घटनेचे गांभीर्य वाढण्याची शक्यता असते. मात्र या संवेदनशील प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने भगूरकरांमध्ये तीव्र नाराजी आहे. भगूर नगरपालिकेने अग्निशमन केंद्राचे महत्त्व लक्षात घेऊन २०१३ मध्ये १८ लाख रुपये खर्च करून अग्निशमन बंब खरेदी केला. तसेच ३४ लाख रुपये खर्च करून मोठ्या गणपती मंदिराजवळ अग्निशमन सेवा केंद्र व कामगारांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली. आग विझविण्यासाठी व आपत्कालीन परिस्थितीत लागणारे सर्व साहित्यदेखील खरेदी करण्यात आले आहे. नगरपालिकेने रहिवाशांच्या घरपट्टीमध्ये अग्निशमन करही समाविष्ट करून वसुली सुरू केली आहे.भगूर नगरपालिकेत अग्निशमन केंद्र व इतर विभागाची १७ ते १८ पदे रिक्त असून, वर्षभरापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे नगरपालिकेने कामगार भरतीचा प्रस्ताव पाठविला आहे. अग्निशमन केंद्रासाठी १ अधीक्षक, चालक व चार फायरमन अशा सहा जागांची भरती करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून वारंवार तारीख पे तारीख देत नोकर भरतीचा प्रस्ताव रेटून नेला जात आहे. अशी परिस्थिती केवळ भगूर नगरपालिकेबाबतची नव्हे तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेसंदर्भात असल्याचेदेखील समजते. त्र्यंबक पालिकेने पाठविलेल्या कामगार भरतीचा प्रस्ताव रेंगाळलेला आहे. जिल्हा प्रशासनाकडे भगूर नगरपालिकेच्या कामगार भरतीचा प्रस्तावदेखील धूळखात पडून असल्याने ५० लाख रुपये खर्च करून उभारलेले अग्निशमन केंद्र व बंब हे एक प्रकारे शोभेची वस्तू ठरली आहे. नगरपालिकेने जिल्हा प्रशासनाकडे वर्षभरात अनेकवेळा नोकरभरतीच्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा केला आहे. मात्र अद्यापही नोकरीभरती प्रस्तावाच्या फाईलवरील धूळ ‘जैसे थे’च आहे. भगूर पालिकेला आदर्श नगरपालिकेचा पुरस्कार मिळाल्यानंतर पालिकेसाठी अग्निशमन केंद्र असावे असा विचार पुढे आला आणि त्यासाठीची महाराष्ट्र शासनाकडून तरतूदही करण्यात आली. सुमारे ८० लाख निधी मिळाल्यानंतर युद्धपातळीवर अग्निशमन इमारतीचे काम आणि वाहन खरेदी करण्यात आली. मात्र सर्व सज्जता असतानाही केवळ मनुष्यबळ नसल्याने अग्निशमन केंद्र असून नसल्यासारखे आहे.