शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

बीएलओंवर गुन्हे दाखल करण्यास अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:28 IST

नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले असून, या कामासाठी बीएलओ म्हणून नेमण्यात आलेल्या शिक्षकांनी असहकार्याची भूमिका घेत काम करण्यास नकार दिल्याने अशा बीएलओंवर निलंबनाच्या नोटिसा व त्यानंतर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणारे जिल्हा प्रशासन बॅकफूटवर गेले आहे. यासंदर्भात शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याने त्यांच्यावर कोणतीही केलेली कारवाई प्रशासनाच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कार्यवाही करू नये, असे आदेश दिल्याने फौजदारी गुन्हे दाखल केल्यास अवमान होण्याचा संभव आहे.

ठळक मुद्देप्रशासन बॅकफूटवर न्यायालयीन अवमान होण्याची शक्यता

नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले असून, या कामासाठी बीएलओ म्हणून नेमण्यात आलेल्या शिक्षकांनी असहकार्याची भूमिका घेत काम करण्यास नकार दिल्याने अशा बीएलओंवर निलंबनाच्या नोटिसा व त्यानंतर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणारे जिल्हा प्रशासन बॅकफूटवर गेले आहे. यासंदर्भात शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याने त्यांच्यावर कोणतीही केलेली कारवाई प्रशासनाच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कार्यवाही करू नये, असे आदेश दिल्याने फौजदारी गुन्हे दाखल केल्यास अवमान होण्याचा संभव आहे.निवडणूक आयोगाने बीएलओंना मतदारांच्या घरोघरी पाठवून प्रत्येक मतदाराची वैयक्तिक माहिती गोळा करण्याच्या सूचना केल्या असून, त्यासाठी फॉर्म १ ते ८ मध्ये नमुन्यातील माहिती भरून आणण्याबरोबरच मतदारांचे रंगीत छायाचित्र, भ्रमणध्वनी क्रमांक संकलित करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी जून महिन्यातच सदरचे काम पूर्ण करण्याच्या आयोगाच्या सूचना असताना प्रत्यक्षात बीएलओंनी काम करण्यास नकार दिल्यामुळे जिल्ह्यात जुलैपर्यंत फक्त ६९ टक्केच काम होऊ शकले. त्यामुळे ज्या ज्या मतदारसंघातील बीएलओंनी काम करण्यास नकार दिला त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मतदार नोंदणी अधिकाºयांची बैठक घेऊन बीएलओंवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे प्रारंभी मतदार नोंदणी अधिकाºयांनी निलंबनाच्या नोटिसा बजावल्या़ उलट अनेक सबबी सांगून मतदार यादीचे काम टाळण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याची तयारी प्रशासन करीत असताना काही शिक्षक संघटनांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेचा संदर्भ देत शिक्षकांवर कारवाई केल्यास न्यायालयाचा अवमान होणार असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.न्यायालयाच्या सूचनाशिक्षक संघ व शिक्षक सेनेने सन २०१७ मध्ये न्यायालयात दावा दाखल करून शिक्षकांना बीएलओ म्हणून नेमू नये अशी विनंती केली असून, न्यायालयात फेब्रुवारी २०१८ मध्ये त्याची सुनावणी होऊन पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कार्यवाही करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांवर कारवाई करण्यास अडचण निर्माण झाली असून, दुसरीकडे निवडणूक आयोगाचे काम पूर्ण कसे करावे, असा प्रश्न उभा ठाकला आहे.

टॅग्स :Governmentसरकार