शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आहारमासात उपासमारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:36 IST

सरकारी यंत्रणांतील बेफिकिरीचा मुद्दा तर वारंवार चर्चेत येत असतोच; पण त्यांच्या या बेफिकिरीमुळे पुरवठादार अगर ठेकेदारही किती बेगुमान होत चालले आहेत व त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे, याची प्रचिती जिल्हा परिषदेत येत आहे.

ठळक मुद्देकारवाईचे कागदी घोडे नाचविण्यापेक्षा अशा प्रश्नांची उत्तरे शोधायला हवी.

सरकारी यंत्रणांतील बेफिकिरीचा मुद्दा तर वारंवार चर्चेत येत असतोच; पण त्यांच्या या बेफिकिरीमुळे पुरवठादार अगर ठेकेदारही किती बेगुमान होत चालले आहेत व त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे, याची प्रचिती जिल्हा परिषदेत येत आहे.खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी शिक्षण खात्याकडून पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत खिचडीसाठी तांदुळाचा पुरवठा करण्यात येत असतो. या खिचडीत निकृष्टता असते, अशा तक्रारी आजवर नित्याच्याच ठरल्या होत्या; परंतु आता या खिचडीसाठीचा तांदूळ गेल्या दीड-दोन महिन्यांपासून मिळालेलाच नसल्याची ओरड होऊ लागली आहे. हा तांदूळ पुरवठ्यासंबंधातील खर्चाशी निगडित काही मागण्या ठेकेदारांच्या असूही शकतील; परंतु त्याचा निर्णय होत नाही म्हणून शाळा-शाळांना तांदूळ पुरवण्याचेच रोखून धरले जात आहे हे पूर्णत: गैर व अडवणुकीचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपासमार घडून येत असून, त्यामागील शासनाच्या हेतूलाच हरताळ फासला जात आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराबाबतची जाणीव जागृती करून देण्यासाठी शासनातर्फे सप्टेंबर महिना हा खास आहारमास म्हणून साजरा केला जात असताना त्यातच जणू अडचणीचा फाल्गुनमास ओढवला आहे. यात संबंधित ठेकेदारांवर काय कारवाई व्हायची ती होईलही, परंतु विद्यार्थ्यांना आहारापासून वंचित राहावे लागल्याची जी वेळ निघून गेली आहे तिची भरपाई कशी होणार? आता विलंबाने तांदूळ पुरवठा केला तरी, जे दिवस निघून गेले त्या दिवसांच्या हिशेबाने विद्यार्थ्यांना घरीच तांदूळ देणार का असेही प्रश्न उपस्थित होणारे आहेत. तेव्हा कारवाईचे कागदी घोडे नाचविण्यापेक्षा अशा प्रश्नांची उत्तरे शोधायला हवी.