शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

धुळे-नाशिक महामार्ग होणार सहापदरी

By admin | Updated: July 17, 2016 00:56 IST

सुभाष भामरे यांची माहिती : वर्षभरात कामाला सुरुवात; प्रवास आणकी सुखकर होणार

 मालेगाव : नाशिक - धुळे महामार्ग केंद्र सरकारच्या चतुष्कोन योजनेतून सहापदरी होणार असून, या महामार्गासाठीचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. वर्षभरात महामार्गाच्या कामाला सुरुवात होईल. त्यामुळे धुळे ते नाशिक हा प्रवास आणखी सुकर होणार आहे.संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे धुळे ते नाशिक या महामार्गाचे सहापदरीकरण व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागील वर्षभरापासून प्रयत्न सुरू होते. त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी-करणाला केंद्र सरकारने मान्यता प्रदान केली आहे.केंद्र सरकारच्या योजनेतून या चतुष्कोन महामार्गासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम सुरू असून, वर्षभरात महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. त्यामुळे धुळे ते नाशिक हा प्रवास आणखी सुकर होणार आहे. सध्या धुळे येथून नाशिक येथे जाण्यासाठी अडीच तासाचा कालावधी लागतो. सदर महामार्ग सहापदरीकरण झाल्यावर हा कालावधी आणखी कमी होणार आहे.या महामार्गाचे चौपदरीकरण काही वर्षांपूर्वी होऊनसुद्धा या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी झालेले नव्हते त्यामुळे या महामार्गाचे सहापदरीकरण व्हावे, अशी मागणी व प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच डॉ.सुभाष भामरे यांच्याकडे आला होता. सदर मागणीची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दखल घेतली. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे याबाबत भेट घेतली होती. त्यावेळेला गडकरी यांनी डॉ. भामरे यांना आश्वासन दिले होते. धुळे ते नाशिक या चौपदरी महामार्गाचे लवकरच केंद्र सरकारच्या माध्यमातून सहापदरी-करण करण्यात येईल. या अनुषंगाने सदर प्रस्तावाला केंद्र शासनाच्या चतुष्कोन योजनेतून मंजुरी देण्यात आली. आता हा महामार्ग सहापदरी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने डीटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. हा अहवाल नाशिक प्रकल्प कार्यालयाकडून दिला जाणार आहे. प्रधान कार्यालयाकडून अंतिम मंजुरीनंतर पुढील प्रक्रि या सुरु होणार आहे. तांत्रिक प्रक्रियेसाठी साधारणत: एक वर्षाचा कालावधी अपेक्षित असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरु वात होणार आहे. सदर महामार्ग सहापदरीकरणाचे काम तीन टप्यात पूर्ण होईल. (प्रतिनिधी)