शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धुळे-नाशिक महामार्ग होणार सहापदरी

By admin | Updated: July 17, 2016 00:56 IST

सुभाष भामरे यांची माहिती : वर्षभरात कामाला सुरुवात; प्रवास आणकी सुखकर होणार

 मालेगाव : नाशिक - धुळे महामार्ग केंद्र सरकारच्या चतुष्कोन योजनेतून सहापदरी होणार असून, या महामार्गासाठीचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. वर्षभरात महामार्गाच्या कामाला सुरुवात होईल. त्यामुळे धुळे ते नाशिक हा प्रवास आणखी सुकर होणार आहे.संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे धुळे ते नाशिक या महामार्गाचे सहापदरीकरण व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागील वर्षभरापासून प्रयत्न सुरू होते. त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी-करणाला केंद्र सरकारने मान्यता प्रदान केली आहे.केंद्र सरकारच्या योजनेतून या चतुष्कोन महामार्गासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम सुरू असून, वर्षभरात महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. त्यामुळे धुळे ते नाशिक हा प्रवास आणखी सुकर होणार आहे. सध्या धुळे येथून नाशिक येथे जाण्यासाठी अडीच तासाचा कालावधी लागतो. सदर महामार्ग सहापदरीकरण झाल्यावर हा कालावधी आणखी कमी होणार आहे.या महामार्गाचे चौपदरीकरण काही वर्षांपूर्वी होऊनसुद्धा या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी झालेले नव्हते त्यामुळे या महामार्गाचे सहापदरीकरण व्हावे, अशी मागणी व प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच डॉ.सुभाष भामरे यांच्याकडे आला होता. सदर मागणीची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दखल घेतली. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे याबाबत भेट घेतली होती. त्यावेळेला गडकरी यांनी डॉ. भामरे यांना आश्वासन दिले होते. धुळे ते नाशिक या चौपदरी महामार्गाचे लवकरच केंद्र सरकारच्या माध्यमातून सहापदरी-करण करण्यात येईल. या अनुषंगाने सदर प्रस्तावाला केंद्र शासनाच्या चतुष्कोन योजनेतून मंजुरी देण्यात आली. आता हा महामार्ग सहापदरी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने डीटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. हा अहवाल नाशिक प्रकल्प कार्यालयाकडून दिला जाणार आहे. प्रधान कार्यालयाकडून अंतिम मंजुरीनंतर पुढील प्रक्रि या सुरु होणार आहे. तांत्रिक प्रक्रियेसाठी साधारणत: एक वर्षाचा कालावधी अपेक्षित असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरु वात होणार आहे. सदर महामार्ग सहापदरीकरणाचे काम तीन टप्यात पूर्ण होईल. (प्रतिनिधी)