शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

धोकादायक झाडांविषयी निर्णय घ्या; शिंदे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 14:17 IST

नाशिक : मुंबई येथे वृक्ष कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झाडे तोडण्यासंदर्भातील अर्जांची दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मुंबईत चेंबूर येथे एका सोसायटीत जीर्ण वृक्ष कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. सदरचे झाड धोकादायक असल्याने ते ...

ठळक मुद्देमुंबई येथे वृक्ष कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झाडे तोडण्यासंदर्भातील अर्जांची दखल नाशिक शहरातही अनेक जीर्ण आणि धोकादायक वृक्ष दुर्घटना होण्याच्या आतच त्यावर निर्णय होण्याची गरज आहे.महापालिकेकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत त्वरित निर्णय घ्यावा,

नाशिक : मुंबई येथे वृक्ष कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झाडे तोडण्यासंदर्भातील अर्जांची दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मुंबईत चेंबूर येथे एका सोसायटीत जीर्ण वृक्ष कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. सदरचे झाड धोकादायक असल्याने ते तोडण्यासाठी महापालिकेकडे तक्रार करूनही त्यांनी दखल न घेतल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. नाशिक शहरातही अनेक जीर्ण आणि धोकादायक वृक्ष असून, ते पाडण्यासाठी महापालिकेकडे नागरिकांनी अर्ज केले आहेत. मात्र, नाशिक महापालिकेत याबाबत कोणत्याही प्रकारे सत्वर निर्णय घेतला जात नाही, अशी तक्रार आहे. त्या पार्श्वभूमीवर विलास शिंदे यांनी निवेदन दिले आहे. सदरची झाडे पडून कोणत्याही प्रकारची दुर्घटना होण्याच्या आतच त्यावर निर्णय होण्याची गरज आहे. या अर्जांची पडताळणी करून जे वृक्ष खरोखरीच पाडण्यायोग्य आहेत त्यानुसार त्यांना परवानगी द्यावी आणि योग्य नसल्यास तसा अहवाल विशिष्ट कालमर्यादेत देणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. वृक्षतोडीला मान्यता देण्याची सध्याची प्रक्रिया खूपच क्लिष्ट आहे. वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठका, मान्यता आणि प्रत्यक्ष पाहणी यातून मोठ्या प्रमाणात कालहरण होत असल्याने अशावेळी धोकादायक झाड आपोआप कोसळून दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे सध्या महापालिकेकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणीही शेवटी निवेदनात करण्यात आली आहे.