शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

धनगर समाजाचा आरक्षण प्रस्ताव अंतिम टप्प्यात

By admin | Updated: May 29, 2016 00:17 IST

गिरीश महाजन : होळकर जयंती कार्यक्रमात दिली माहिती

नाशिक : धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहेच; परंतु आरक्षण मिळण्यासाठी तांत्रिक बाजूदेखील तपासून पहाणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आरक्षण संदर्भातील काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीतर्फे शनिवारी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात दिली.परशुराम साईखेडकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलत असताना उपस्थितांनी भाषण थांबवून ‘धनगरांना आरक्षण कधी मिळणार ?’ असा जाब विचारल्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आरक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगताना केंद्र सरकारनेही या आरक्षणाला मंजुरी देणे आवश्यक असताना या प्रक्रियेसाठी थोडा वेळ जाणार असल्याचे सांगितले. राज्य सरकारने जरी आरक्षणाला मंजुरी दिली तर ते धनगर समाजाचे तात्पुरते समाधान असेल त्यामुळे सरकारवर धनगर समाजाने विश्वास ठेवायला हवा, असे अवाहनही महाजन यांनी यावेळी केले. राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कायमच सकारात्मक दृष्टिकोन राहिला आहे. आरक्षणासाठी ‘टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स’ या संस्थेकडून संशोधन आणि सामाजिक परीक्षण केले जात आहे. आधीच्या सरकारने आरक्षणाबाबत तत्कालीन केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असला तरी त्यातल्या त्रुटी दूर करून नव्याने प्रस्ताव सादर करणार असल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमांतर्गत गिरीश महाजन यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विकास महात्मे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे लक्ष वेधत आरक्षणाची प्रक्रिया लांबणीवर पडत असून तातडीने आरक्षणाचा निर्णय घेण्याचे आवाहन केले. महात्मे यांनी धनगर समाजाची विविध गटात विभागणी झाली हे चुकीचे असून, सगळ्यांनी एकोप्याने काम करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान अहल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, नाशिक यांच्यातर्फे ‘पुण्यश्लोक आदर्श विवाह पुरस्कार’, ‘वीर मल्हार पुरस्कार’ आणि इतर राज्यांतून आलेल्या ज्येष्ठ समाजसेवकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सांगता सोहळ्याप्रसंगी हेमंत शिंदे दिग्दर्शित ‘मी अहल्या बोलतेय’ या एकपात्री नाटकाचेही सादरीकरण करण्यात आले.यावेळी आमदार बाळासाहेब सानप, डॉ. डी. एल. कराड, बापू शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास धनगर समाजबांधवांसह भाऊसाहेब तांबडे, टी. एस. बघेल, भवरसिंग होळकर, निरंजन धनगर, आमदार बाळासाहेब सानप, डॉ. सुनीता महाले, घनश्याम होळकर, रामेश्वर पाटील, गोरख जाधव आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)