शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

‘नेटवर्क ’साठी डीजीपीनगरवासीय अंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:02 IST

माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात मेक इन इंडियाचे स्वप्न बघितले जात असताना स्मार्टफोन वापरणाऱ्या शहरातील डीजीपीनगर क्रमांक-१ मधील रहिवाशांना मात्र नेटवर्क मिळविण्यासाठी चक्क मोठा संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यावर बसून रहिवासी नेटवर्कची प्रतीक्षा करतानाचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे. मोबाइल नेटवर्क पुरविणाºया सर्वच कंपन्यांच्या नावाने या भागात ओरड होत आहे.

नाशिक : माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात मेक इन इंडियाचे स्वप्न बघितले जात असताना स्मार्टफोन वापरणाऱ्या शहरातील डीजीपीनगर क्रमांक-१ मधील रहिवाशांना मात्र नेटवर्क मिळविण्यासाठी चक्क मोठा संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यावर बसून रहिवासी नेटवर्कची प्रतीक्षा करतानाचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे. मोबाइल नेटवर्क पुरविणाºया सर्वच कंपन्यांच्या नावाने या भागात ओरड होत आहे.  डीजीपीनगर क्रमांक-१ हा परिसर दुर्गम किंवा आदिवासी भागातील नाही तर जिल्हा परिषद कर्मचाºयांची सर्वात जुनी वसाहत व महापालिकेच्या आरोग्य सभापतींचे निवासस्थान असलेल्या हा परिसर नाशिक-पुणे महामार्गाला लागून आहे. डीजीपीनगर गृहनिर्माण संस्था ही सर्वात जुनी गृहनिर्माण संस्था म्हणून ओळखली जाते. या भागात मोबाइल कंपन्यांकडून नेटवर्क अत्यंत कमकु वतरीत्या पुरविले जात असल्याने नागरिकांच्या नाकीनव आले आहे. याचा सर्वाधिक त्रास गृहिणींना सहन करावा लागत आहे. डीजीपीनगर येथील घरांमध्ये कुठल्याही कंपनीचे नेटवर्क अजिबात मिळत नाही. त्यामुळे जोपर्यंत उंबरा ओलांडून बाहेर येणार नाही, तोपर्यंत मोबाइल कंपन्यांचे नेटवर्कचे चिन्ह दिसत नाही. तुमचा स्मार्टफोन कितीही महागडा असला व लेटेस्ट सिस्टम अपडेट वर्जन जरी असले तरी डीजीपीनगरमध्ये प्रवेश करताच जणू तुमच्या स्मार्टफोनच्या नेटवर्कला जणू आपोआप ‘जॅमर’ लागतो. मागील काही महिन्यांपासून ही समस्या मोठ्या स्वरूपात भेडसावत असल्याने डीजीपीनगरवासी त्रस्त झाले आहेत. ज्या कंपनीचे सीमकार्ड वापरले जात आहे, त्या कंपनीच्या ग्राहक सेवा अधिकाºयांशी वारंवार संपर्क साधून रहिवाशांनी ही समस्या निदर्शनास आणून दिली आहे; मात्र कुठल्याही कंपनीकडून या समस्येवर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नसल्याचे नागरिक सांगतात. एकूणच स्मार्टफोनवर संवाद साधणे डीजीपीनगरमधून जिकिरीचे ठरत असल्यामुळे इंटरनेटचा वापर व त्यासाठी लागणाºया ‘डेटा स्पीड’बाबत कल्पना न केलेली बरी.मोबाइल चोरी जाण्याच्या घटनामोबाइलला रेंज मिळत नाही म्हणून डीजीपीनगरवासीयांना घराच्या खिडकीमध्ये मोबाइल ठेवावा लागतो. त्यामुळे मोबाइल अलगदपणे चोरट्याकडून खिडकीमधून लंपास केले जाण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. चोरट्यांनीही डीजीपीनगर भागाकडे आपली दृष्टी फिरवली असून, मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रेंज मिळविण्यासाठी प्रचंड वेळ लागतो. मोबाइलची बॅटरी संपुष्टात येते. काही नागरिक मोबाइल चार्जिंगला लावून खिडक ीमध्ये ठेवतात. दिवसभर घरात महिला कामामध्ये असतात, अशावेळी चोरट्यांकडून मोबाइल लंपास केले जाते.अशोकामार्गावरही समस्याडीजीपीनगर क्रमांक-१पासून जवळ असलेल्या अशोकामार्ग परिसरातही मोबाइल नेटवर्कची समस्या काही महिन्यांपासून भेडसावत असल्याने नागरिकही वैतागले आहेत. नेमक्या कोणत्या कंपनीमध्ये पोर्टेबिलिटी करावी, हा येथील रहिवाशांपुढे यक्षप्रश्न आहे, असे म्हणणे वावगे होणार नाही. या भागात मोठ्या संख्येने घरगुती प्रकल्प आहेत. फ्लॅटमध्ये मोबाइल नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पैसे भरूनही मोबाइल कं पन्यांकडून गलथान सेवा दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे....तुमचा फोनच लवकर लागत नाही’डीजीपीनगरवासीयांचा मित्रपरिवार, नातेवाइकांकडून सध्या एकच वाक्य मागील काही दिवसांपासून त्यांच्या कानी पडत आहे. ते म्हणजे, ‘अहो, तुमचा फोनच लवकर लागत नाही.’ जोपर्यंत मोबाइल खिडकीमध्ये किंवा अंगणात घेऊन येत नाही, तोपर्यंत रेंज येत नाही आणि संपर्कही होत नाही.यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :Mobileमोबाइल