शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

‘नेटवर्क ’साठी डीजीपीनगरवासीय अंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:02 IST

माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात मेक इन इंडियाचे स्वप्न बघितले जात असताना स्मार्टफोन वापरणाऱ्या शहरातील डीजीपीनगर क्रमांक-१ मधील रहिवाशांना मात्र नेटवर्क मिळविण्यासाठी चक्क मोठा संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यावर बसून रहिवासी नेटवर्कची प्रतीक्षा करतानाचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे. मोबाइल नेटवर्क पुरविणाºया सर्वच कंपन्यांच्या नावाने या भागात ओरड होत आहे.

नाशिक : माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात मेक इन इंडियाचे स्वप्न बघितले जात असताना स्मार्टफोन वापरणाऱ्या शहरातील डीजीपीनगर क्रमांक-१ मधील रहिवाशांना मात्र नेटवर्क मिळविण्यासाठी चक्क मोठा संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यावर बसून रहिवासी नेटवर्कची प्रतीक्षा करतानाचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे. मोबाइल नेटवर्क पुरविणाºया सर्वच कंपन्यांच्या नावाने या भागात ओरड होत आहे.  डीजीपीनगर क्रमांक-१ हा परिसर दुर्गम किंवा आदिवासी भागातील नाही तर जिल्हा परिषद कर्मचाºयांची सर्वात जुनी वसाहत व महापालिकेच्या आरोग्य सभापतींचे निवासस्थान असलेल्या हा परिसर नाशिक-पुणे महामार्गाला लागून आहे. डीजीपीनगर गृहनिर्माण संस्था ही सर्वात जुनी गृहनिर्माण संस्था म्हणून ओळखली जाते. या भागात मोबाइल कंपन्यांकडून नेटवर्क अत्यंत कमकु वतरीत्या पुरविले जात असल्याने नागरिकांच्या नाकीनव आले आहे. याचा सर्वाधिक त्रास गृहिणींना सहन करावा लागत आहे. डीजीपीनगर येथील घरांमध्ये कुठल्याही कंपनीचे नेटवर्क अजिबात मिळत नाही. त्यामुळे जोपर्यंत उंबरा ओलांडून बाहेर येणार नाही, तोपर्यंत मोबाइल कंपन्यांचे नेटवर्कचे चिन्ह दिसत नाही. तुमचा स्मार्टफोन कितीही महागडा असला व लेटेस्ट सिस्टम अपडेट वर्जन जरी असले तरी डीजीपीनगरमध्ये प्रवेश करताच जणू तुमच्या स्मार्टफोनच्या नेटवर्कला जणू आपोआप ‘जॅमर’ लागतो. मागील काही महिन्यांपासून ही समस्या मोठ्या स्वरूपात भेडसावत असल्याने डीजीपीनगरवासी त्रस्त झाले आहेत. ज्या कंपनीचे सीमकार्ड वापरले जात आहे, त्या कंपनीच्या ग्राहक सेवा अधिकाºयांशी वारंवार संपर्क साधून रहिवाशांनी ही समस्या निदर्शनास आणून दिली आहे; मात्र कुठल्याही कंपनीकडून या समस्येवर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नसल्याचे नागरिक सांगतात. एकूणच स्मार्टफोनवर संवाद साधणे डीजीपीनगरमधून जिकिरीचे ठरत असल्यामुळे इंटरनेटचा वापर व त्यासाठी लागणाºया ‘डेटा स्पीड’बाबत कल्पना न केलेली बरी.मोबाइल चोरी जाण्याच्या घटनामोबाइलला रेंज मिळत नाही म्हणून डीजीपीनगरवासीयांना घराच्या खिडकीमध्ये मोबाइल ठेवावा लागतो. त्यामुळे मोबाइल अलगदपणे चोरट्याकडून खिडकीमधून लंपास केले जाण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. चोरट्यांनीही डीजीपीनगर भागाकडे आपली दृष्टी फिरवली असून, मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रेंज मिळविण्यासाठी प्रचंड वेळ लागतो. मोबाइलची बॅटरी संपुष्टात येते. काही नागरिक मोबाइल चार्जिंगला लावून खिडक ीमध्ये ठेवतात. दिवसभर घरात महिला कामामध्ये असतात, अशावेळी चोरट्यांकडून मोबाइल लंपास केले जाते.अशोकामार्गावरही समस्याडीजीपीनगर क्रमांक-१पासून जवळ असलेल्या अशोकामार्ग परिसरातही मोबाइल नेटवर्कची समस्या काही महिन्यांपासून भेडसावत असल्याने नागरिकही वैतागले आहेत. नेमक्या कोणत्या कंपनीमध्ये पोर्टेबिलिटी करावी, हा येथील रहिवाशांपुढे यक्षप्रश्न आहे, असे म्हणणे वावगे होणार नाही. या भागात मोठ्या संख्येने घरगुती प्रकल्प आहेत. फ्लॅटमध्ये मोबाइल नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पैसे भरूनही मोबाइल कं पन्यांकडून गलथान सेवा दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे....तुमचा फोनच लवकर लागत नाही’डीजीपीनगरवासीयांचा मित्रपरिवार, नातेवाइकांकडून सध्या एकच वाक्य मागील काही दिवसांपासून त्यांच्या कानी पडत आहे. ते म्हणजे, ‘अहो, तुमचा फोनच लवकर लागत नाही.’ जोपर्यंत मोबाइल खिडकीमध्ये किंवा अंगणात घेऊन येत नाही, तोपर्यंत रेंज येत नाही आणि संपर्कही होत नाही.यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :Mobileमोबाइल