शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

ब्रह्मगिरीच्या परिक्रमेला यंदाही भाविक मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : व्रतवैकल्याचा, सणावाराचा, शिवोपासनेचा सण म्हणजे श्रावण मास होय. यंदा ९ ऑगस्टपासून श्रावणमासास प्रारंभ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

त्र्यंबकेश्वर : व्रतवैकल्याचा, सणावाराचा, शिवोपासनेचा सण म्हणजे श्रावण मास होय. यंदा ९ ऑगस्टपासून श्रावणमासास प्रारंभ होणार असून, सुरुवात सोमवारी आणि शेवटही सोमवारी असा योग जुळून आला आहे. श्रावणमासाच्या दर सोमवारी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी लाखो शिवभक्त येत असतात. गतवर्षीप्रमाणेच यंदाही शासनाने कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता ब्रह्मगिरीच्या परिक्रमेला परवानगी नाकारली आहे.

यावर्षी पाच श्रावण सोमवार येत असून, येत्या ८ ऑगस्टला आषाढ अमावास्या झाल्यानंतर ९ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. सोमवारपासूनच श्रावणमासास प्रारंभ होणार असून, तर श्रावण अमावास्यादेखील सोमवारी असल्याने यावर्षीच्या श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. त्र्यंबकेश्वरी श्रावण महिन्यात मोठी गर्दी असते. विशेषत: श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीची परिक्रमा करण्यासाठी लाखो भाविक येत असतात. एसटी महामंडळाकडूनही त्यासाठी विशेष नियोजन केले जात असते; परंतु मागील वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट श्रावण महिन्यावर असल्याने आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने शासनाने ब्रह्मगिरीच्या फेरीस परवानगी नाकारली असल्याची माहिती प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली आहे. शासनाने अजूनही मंदिरे खुली करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यंदाही भाविकांना ब्रह्मगिरीच्या फेरीला मुकावे लागणार आहे. त्र्यंबकेश्वर शहरात धार्मिक विधीही बंद आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासन अजूनही धोका पत्कारायला तयार नाही. त्यामुळे यंदाही श्रावण मासात होणारी उलाढाल ठप्प होणार आहे. त्र्यंबकेश्वरी श्रावण मासात लाखो भाविक येत असल्याने अनेकांचा रोजगार त्यावर अवलंबून आहे. गेल्या वर्षीही व्यावसायिकांना त्याचा फटका बसला. आताही त्याची झळ बसणार असल्याने व्यावसायिकांकडून निर्बंधाला विरोध होत आहे.

इन्फो

येत्या १३ ऑगस्टला नागपंचमी, १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन, १६ ऑगस्टला पारशी नववर्ष, तर दि. १७ ऑगस्ट रोजी मंगळागौरी पूजन, दि.१९ रोजी मोहरम, तसेच रविवारी दि.२२ रोजी रक्षाबंधनाचा सण आहे. ३० ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. दि.३ व ४ सप्टेंबर रोजी चतुर्थी पक्षाचा पर्युषण पर्व व पंचमी पक्षाचा पर्युषण पर्व आहे. दि.६ सप्टेंबर रोजी सोमवती अमाआस्या आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्यातील सोमवती अमाआस्येला विशेष महत्त्व दिले जाते. श्रावण महिन्यात सणवार असल्याने सुट्यांचा काळ आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरी देवदर्शनासाठी नेहमी गर्दी होत असते. यंदा मात्र परवानगी नसल्याने भाविकांचा हिरमोड होणार आहेे.