शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

भाविकांना टवाळखोरांचा उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:14 IST

विहिरींनी गाठला तळ नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असून, नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू ...

विहिरींनी गाठला तळ

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असून, नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ज्या गावांमध्ये नळपाणी पुरवठा योजना आहेत, त्यांच्यावरही ताण येऊ लागला आहे. शासनाने ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होऊ लागली आहे.

कमी दाबाने पाणी पुरवठ्याची तक्रार

नाशिक : शहरातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यामुळे महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

शहरात उन्हाची तीव्रता वाढली

नाशिक : मार्च महिन्यातच शहरात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून, दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक जाणवते. शहरातील चौकाचौकात शीतपेय विक्रीची दुकाने सुरू होऊ लागली आहेत. नागरिकांकडूनही शीतपेयांची मागणी वाढल्याने, या व्यावसायिकांना रोजगार मिळू लागला आहे.

किरकोळ बाजारात कांदादर चढेच

नाशिक : आवक वाढल्याने घाऊक बाजारांमध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असली, तरी किरकोळ बाजारात अद्याप कांद्याचे दर चढेच आहेत. कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या वर्षी शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

नाशिक : उपनगर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही वेळा रात्रीच्या वेळी वीजपुवरठा खंडित होतो. यामुळे नागरिकांना झोप घेणे कठीण होते. उन्हाळा सुरू होताच, वीजपुरवठा खंडित होऊ लागल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्य वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.