शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

कावडीधारकांकडून देवीला जलाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:30 IST

कळवण : ‘वारी वारी जन्मा मराणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी’ या आरतीतील ओवीप्रमाणेच कावडधारक वारीने आज सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी पोहोचले. देशभरातील पवित्र नद्यांच्या जलाने व पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भगवतीचा जलाभिषेक करण्यात आला. दीड लाखांहून अधिक कावडधारकांचा हा सोहळा डोळ्यात साठवत दीड लाखांहून अधिक भाविक सप्तशृंगी चरणी नतमस्तक झाले. रात्री उशिरापर्यंत जलाभिषेक सोहळा हा सुरू होता.

ठळक मुद्दे कोजागरी पौर्णिमा : देशभरातील नद्यांतून आणले जल

कळवण : ‘वारी वारी जन्मा मराणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी’ या आरतीतील ओवीप्रमाणेच कावडधारक वारीने आज सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी पोहोचले. देशभरातील पवित्र नद्यांच्या जलाने व पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भगवतीचा जलाभिषेक करण्यात आला. दीड लाखांहून अधिक कावडधारकांचा हा सोहळा डोळ्यात साठवत दीड लाखांहून अधिक भाविक सप्तशृंगी चरणी नतमस्तक झाले. रात्री उशिरापर्यंत जलाभिषेक सोहळा हा सुरू होता.येथील कोजागरी उत्सव नेहमीच आकर्षक ठरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह गुजरात व मध्य प्रदेशातून हजारो पायी यात्रेने सप्तशृंग गडावर येतात. महिनाभरापासून तर काही जण पंधरा दिवसांपासून विविध नद्यांचे जल सजविलेल्या कमंडलातून घेऊन येतात. अंगात भगवी वस्रे व खांद्यावर कावड घेऊन गेल्या तीन दिवसांपासून कळवण ते नांदुरीचे रस्ते फुलून गेले होते. सोमवारी रात्री नांदुरी मुक्कामी पोहचलेल्या कावडधारकांचा जथा सकाळपासूनच गडाकडे कूच करत होता. नांदुरी ते सप्तशृंगगड या पायी रस्त्यावरचे दृश्य डोळ्यात साठविण्यासारखे होते. हिरवळीने नटलेल्या गडाच्या कुशीतून कावडधारक वाट काढत मार्गक्रमण करत होते.ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र सूर्यवंशी, देवीभक्त गुलशन पटेल यांच्या हस्ते व व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर, भिकन वाबळे, संदीप बेनके पाटील, शांताराम सदगीर यांच्या उपस्थितीत जलाभिषेक करण्यात आला. मध्यरात्रीपर्यंत भगवतीचा जलाभिषेक सुरू होता. कोजागरी उत्सवासह संपूर्ण नवरात्रोत्सव शांततेत व उत्साहात पार पडल्याबद्दल ट्रस्टने भाविकांचे आभार मानले.तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्यासह सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भिकन वाबळ, भगवान नेरकर, भिकन वाबळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके पाटील, शांताराम सदगीर, गिरीश गवळी, राजेश गवळी आदींसह सप्तशृंगगडावरील सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी नवरात्रोत्सव कालावधीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.सप्तशृंगीमातेचा जल्लोषपायºयांवर पहाटे ६ वाजेपासूनच गर्दी झाली होती. त्यामुळे दर्शन रांगेतील बाºया लावण्यात आल्या होत्या. कावडधारकांना दुपारनंतर सोडण्यात येणार असल्यामुळे इतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सायंकाळी कावडधारकांना मंदिरात सोडण्यात आले. मुळा, मुठा, नर्मदा, गोदावरी, तापी, गंगा, यमुना, शिप्रा, गिरणा, मोसम आदी पवित्र नद्यांचे जल घेऊन लाखोंच्या आसपास कावडधारकांनी सप्तशृंगीचा जल्लोष केला.रात्री बाराला आरती करण्यात आली. दिवसभरात कावडधारकांसह दोन लाख भाविक भगवतीच्या चरणी नतमस्तक झाले. त्यात महिलांचा समावेश अधिक होता. कावडधारकांमध्ये त्र्यंबकेश्वर, नाशिक, असलोद, तळोदा, शहादा, नंदुरबार, इंदूर, उज्जैन, पुणे, भीमाशंकर, सिन्नर, नगर, निफाड, प्रकाशा, कासारे येथील भाविकांचा अधिक समावेश होता. सामाजिक संस्थांकडून कावडधारकांसाठी पाणी व चहाची व्यवस्था करण्यात आली होती.