शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

कावडीधारकांकडून देवीला जलाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:30 IST

कळवण : ‘वारी वारी जन्मा मराणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी’ या आरतीतील ओवीप्रमाणेच कावडधारक वारीने आज सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी पोहोचले. देशभरातील पवित्र नद्यांच्या जलाने व पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भगवतीचा जलाभिषेक करण्यात आला. दीड लाखांहून अधिक कावडधारकांचा हा सोहळा डोळ्यात साठवत दीड लाखांहून अधिक भाविक सप्तशृंगी चरणी नतमस्तक झाले. रात्री उशिरापर्यंत जलाभिषेक सोहळा हा सुरू होता.

ठळक मुद्दे कोजागरी पौर्णिमा : देशभरातील नद्यांतून आणले जल

कळवण : ‘वारी वारी जन्मा मराणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी’ या आरतीतील ओवीप्रमाणेच कावडधारक वारीने आज सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी पोहोचले. देशभरातील पवित्र नद्यांच्या जलाने व पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भगवतीचा जलाभिषेक करण्यात आला. दीड लाखांहून अधिक कावडधारकांचा हा सोहळा डोळ्यात साठवत दीड लाखांहून अधिक भाविक सप्तशृंगी चरणी नतमस्तक झाले. रात्री उशिरापर्यंत जलाभिषेक सोहळा हा सुरू होता.येथील कोजागरी उत्सव नेहमीच आकर्षक ठरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह गुजरात व मध्य प्रदेशातून हजारो पायी यात्रेने सप्तशृंग गडावर येतात. महिनाभरापासून तर काही जण पंधरा दिवसांपासून विविध नद्यांचे जल सजविलेल्या कमंडलातून घेऊन येतात. अंगात भगवी वस्रे व खांद्यावर कावड घेऊन गेल्या तीन दिवसांपासून कळवण ते नांदुरीचे रस्ते फुलून गेले होते. सोमवारी रात्री नांदुरी मुक्कामी पोहचलेल्या कावडधारकांचा जथा सकाळपासूनच गडाकडे कूच करत होता. नांदुरी ते सप्तशृंगगड या पायी रस्त्यावरचे दृश्य डोळ्यात साठविण्यासारखे होते. हिरवळीने नटलेल्या गडाच्या कुशीतून कावडधारक वाट काढत मार्गक्रमण करत होते.ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र सूर्यवंशी, देवीभक्त गुलशन पटेल यांच्या हस्ते व व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर, भिकन वाबळे, संदीप बेनके पाटील, शांताराम सदगीर यांच्या उपस्थितीत जलाभिषेक करण्यात आला. मध्यरात्रीपर्यंत भगवतीचा जलाभिषेक सुरू होता. कोजागरी उत्सवासह संपूर्ण नवरात्रोत्सव शांततेत व उत्साहात पार पडल्याबद्दल ट्रस्टने भाविकांचे आभार मानले.तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्यासह सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भिकन वाबळ, भगवान नेरकर, भिकन वाबळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके पाटील, शांताराम सदगीर, गिरीश गवळी, राजेश गवळी आदींसह सप्तशृंगगडावरील सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी नवरात्रोत्सव कालावधीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.सप्तशृंगीमातेचा जल्लोषपायºयांवर पहाटे ६ वाजेपासूनच गर्दी झाली होती. त्यामुळे दर्शन रांगेतील बाºया लावण्यात आल्या होत्या. कावडधारकांना दुपारनंतर सोडण्यात येणार असल्यामुळे इतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सायंकाळी कावडधारकांना मंदिरात सोडण्यात आले. मुळा, मुठा, नर्मदा, गोदावरी, तापी, गंगा, यमुना, शिप्रा, गिरणा, मोसम आदी पवित्र नद्यांचे जल घेऊन लाखोंच्या आसपास कावडधारकांनी सप्तशृंगीचा जल्लोष केला.रात्री बाराला आरती करण्यात आली. दिवसभरात कावडधारकांसह दोन लाख भाविक भगवतीच्या चरणी नतमस्तक झाले. त्यात महिलांचा समावेश अधिक होता. कावडधारकांमध्ये त्र्यंबकेश्वर, नाशिक, असलोद, तळोदा, शहादा, नंदुरबार, इंदूर, उज्जैन, पुणे, भीमाशंकर, सिन्नर, नगर, निफाड, प्रकाशा, कासारे येथील भाविकांचा अधिक समावेश होता. सामाजिक संस्थांकडून कावडधारकांसाठी पाणी व चहाची व्यवस्था करण्यात आली होती.