शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

देवगाव : उत्पन्नात घट होण्याची भीती उन्हाच्या तडाख्याने द्राक्षबागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:50 IST

देवगाव : द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात दरवर्षी विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल होतो. आता वाढत्या उन्हाच्या तडाख्यात द्राक्षबागा सापडल्याने पुन्हा शेतकरी अडचणीत सापडण्याच्या भीतीने चिंताग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत सापडण्याच्या भीतीने चिंताग्रस्तवाढत्या उन्हापासून संरक्षण केले जात आहे

देवगाव : द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात दरवर्षी विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल होतो. आता वाढत्या उन्हाच्या तडाख्यात द्राक्षबागा सापडल्याने पुन्हा शेतकरी अडचणीत सापडण्याच्या भीतीने चिंताग्रस्त झाला आहे. द्राक्ष काढणीचा हंगाम संपताच शेतकऱ्यांनी एप्रिल छाटणीला सुरुवात केली. या छाटण्याही पूर्ण झाल्या; परंतु त्यानंतर बागा फुटण्याच्या प्रतीक्षेत असतानाच वाढत्या उन्हामुळे त्याचा परिणाम द्राक्षवेलींवर होत आहे. शिवाय या फुटीमागे पुढे होत असल्याने शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे शेतकरी वेगवेगळे उपाय करत आहेत. यामध्ये द्राक्षबागांत छाटणीनंतर टाकाऊ काड्या किंवा चिपाड, बारदानाचे आच्छादन तसेच मका कुट्टी, झाडांच्या बुडावर टाकून वाढत्या उन्हापासून संरक्षण केले जात आहे. तसेच ठिंबक सिंचनाद्वारे तसेच थंडावा मिळण्यासाठी संपूर्ण द्राक्षबागांना पाणी दिले जात आहे. सबकेन झालेल्या बागांना जो डोळा दिसत आहे तो कुठे एक डोळा, तर कुठे दोन डोळे अशी सध्या बागांची अवस्था झाली आहे. त्यामुळे येणाºया काळात घट होते की काय, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून द्राक्षबागा धोक्यात येत असल्याने शेतकºयांना उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त करावा लागत आहे.याशिवाय वाढत्या उन्हामुळे शेतीची कामे मंदावली असल्याने मजुरांची टंचाई भासू लागली आहे. सध्या काड्यांची बांधणी, सबकेन, सेंद्रिय खते टाकणे ही कामे केली जात आहे. तसेच ही कामे सकाळी व सायंकाळी होत आहे. त्यामुळे मजूर मिळणे अवघड होत आहे. त्यामुळे ही कामे शेतकºयांना घरीच करावी लागत आहे.