शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

त्र्यंबकेश्वरी धार्मिक विधींसाठी देवेंद्र फडणवीसांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:10 IST

त्र्यंबकेश्वर : येथील धार्मिक विधी व त्यावर अवलंबून असलेले व्यवसाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दीड वर्षापासून बंद आहेत. दुसऱ्या ...

त्र्यंबकेश्वर : येथील धार्मिक विधी व त्यावर अवलंबून असलेले व्यवसाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दीड वर्षापासून बंद आहेत. दुसऱ्या लाॅकडाऊननंतर १ जून २०२१ पासून शासनाने सर्व व्यवसाय, लग्न सोहळे, समारंभ अटी व शर्तीनुसार पाच टप्प्यांमध्ये सुरू केलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसार त्र्यंबकेश्वर येथे होणारे धार्मिक विधी सुरू करण्यास अनुमती मिळवून द्यावी या मागणीसाठी त्र्यंबकेश्वर भाजपच्या वतीने विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्यात आले.

फडणवीस नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर व येथे होणारे धार्मिक विधी यावरच येथील सर्व व्यावसायिक- फूल विक्रेते, हॉटेल, लाॅजिंग, नाभिक, रिक्षा व टॅक्सी चालक, धार्मिक विधीचे कपडे विक्रेते, पूजा साहित्य विक्रेते, तसेच हातावर पोट भरणारे अन्य घटक व पुरोहित वर्गाची उपजीविका अवलंबून आहे. इतर सर्व व्यवसाय व आस्थापना शासनाने सुरू केलेले असताना धार्मिक विधी सुरू करण्याकरिता वारंवार विनंती करूनदेखील शासन दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करीत त्र्यंबकेश्वरचे अर्थचक्र सुरळीत होण्यासाठी शहराध्यक्ष सुयोग वाडेकर व तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते ॲड. श्रीकांत गायधनी, जिल्हा चिटणीस तृप्ती धारणे, प्रशांत बागडे, त्रिवेणी तुंगार, तालुका सरचिटणीस हर्षल भालेराव, मिलिंद धारणे, बाळासाहेब अडसरे, पंकज धारणे, रामचंद्र गुंड, विराज मुळे, रवींद्र (बाळा) सोनवणे, पंकज भुजंग, योगेश गंगापुत्र आदी उपस्थित होते.

इन्फो

विधीस यंत्रणांचा मज्जाव

त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित शासकीय नियमानुसार मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत योग्य ती खबरदारी घेऊन धार्मिक पूजा विधी करण्यास तयार आहेत. इतर सर्व तीर्थक्षेत्री व शहरांमध्ये धार्मिक विधी सुरू आहेत. असे असताना श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या धार्मिक पूजा विधी करण्यास संबंधित शासकीय यंत्रणा मज्जाव करीत आहे.