शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
5
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
6
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
7
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
8
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
9
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
10
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
11
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
12
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
13
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
14
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
15
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
16
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
17
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
18
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
19
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
20
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!

पेसातून मिळाली ‘विकासा’ला चालना, दोन वर्षांत पाचशे कोटींची तरतूद

By admin | Updated: August 9, 2016 00:34 IST

जागतिक आदिवासी दिन विशेष : राज्यातील २,८७३ ग्रामपंचायतींना थेट निधी

 गणेश धुरी नाशिकस्वातंत्र्योत्तर काळापासून अडगळीत पडलेल्या शंभर टक्के आदिवासी ग्रामपंचायती ‘पेसा’चा कायदा लागू झाल्यामुळे विकासाचे एक नवीन दालन खुले झाले. पेसा कायदा लागू झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांत राज्यातील १३ जिल्ह्णांतील ६० तालुक्यांतील २,८७३ ग्रामपंचायतींना पाचशे कोटीहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे.इतकेच नव्हे तर आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने अनुदानित व शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये संयुक्त आश्रमशाळा व्यवस्थापन समितीची स्थापना केली असून, समितीच्या अध्यक्षपदी आदिवासी पालकांचीच निवड करण्यात आली आहे.आदिवासी विशेष घटक योजनांसाठी (टीसीपी) राखीव ठेवण्यात येणाऱ्या एकूण निधीतून तब्बल ५ टक्के रक्कम थेट शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या पेसांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींना त्यांच्या गरजा ओळखून स्थानिक पातळीवर विकास योजना राबविण्यासाठी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील अनुसूचित जमाती क्षेत्रातील ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, जळगाव, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड व पुणे या १३ जिल्ह्णांतील ६० तालुक्यांमध्ये असलेल्या २,८७३ ग्रामपंचायतींतर्गत जवळपास ५९७९ गाव/वाडे/पाडे यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कोष खात्यामध्ये निधी थेट वर्ग करण्यात येत आहे. या वितरित केलेल्या निधीची सर्वस्वी जबाबदारी ग्रामसभेवर असून, ग्रामसभा कोष समितीमार्फत निधीचे सर्व व्यवहार करावयांचे आहेत. या अभियानातून निधीतून करावयाची कामे निवडणे, निधीच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देणे एवढेच नव्हे तर ३ लाखांच्या आतील कामांना तांत्रिक मान्यता देणे हे सर्व अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. या निधीतून चार प्रकारची कामे ग्रामपंचायतींना करता येणार आहेत. त्यात पायाभूत सुविधा पुरविणे, त्यात दफनभूमी, गुदाम, गावांचे अंतर्गत रस्ते, संबंधित पेसा गावातील ग्रामपंचायत शाळा, वनहक्क अधिनियम व पेसा कायद्याची वैशिष्ट्ये या प्रकारात पेसासंदर्भातील माहितीचे मार्गदर्शन व प्रशिक्षण, सामायिक जमिनी विकसित करून देणे, मत्स्यपालन व्यवसाय व मत्स्य बियाणे खरेदी, तसेच तिसऱ्या प्रकारात आरोग्य व शिक्षणविषयक बाबींवर ग्रामपंचायतींना खर्च करता येणार आहे. त्यात सांडपाणी व्यवस्थापन, भूमिगत गटारे, ई-लर्निंग आणि चौथ्या प्रकारात वनीकरणाची कामे करता येणार आहेत. त्यात जलसंधारण, वनतळी, वन्यजीवन पर्यटन या बाबींचा समावेश आहे.