खडकी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कृषिमंत्री व प्रशासकीय यंत्रणा जरी आपल्यासोबत असली तरी सप्तसुत्रीचा पाठपुरावा व त्याची प्रभावी अंमलबाजवणी आवश्यक आहे. यातून मॉडेल गाव निर्माण करण्याचा प्रत्येक ग्रामस्थाने संकल्प करावा. शासन स्तरावर आज किमान २६ प्रस्ताव प्रलंबित असताना नवीन २५ गावे अंतर्भूत करण्यात आली आहेत. यामध्ये खडकी ग्रामपंचायतीचा समावेश असून शासनाच्या कृषी, वने व ग्रामविकासाच्या योजनांची योग्य सांगड घालून गावाचा सर्वांगीण विकास साधता येईल. हगणदारीमुक्त गाव ही संकल्पना शासनासाठी नाही तर गावातील आई-बहिणींसाठीच आहे याची जाणीव जागृती करण्यात यावी, असेही पवार यांनी सांगितले.
यावेळी ग्राम कार्यकर्त्याची निवड करण्यात आली. त्याच बरोबर गावातील तरुण, तरुणी, ज्येष्ठ पुरुष व ज्येष्ठ महिला यांच्या मागण्या व भूमिकाही जाणून घेण्यात आल्या. पवार यांनी सर्व सदस्यांना काही प्रश्न उपस्थित करून त्यांच्याही भावना जाणून घेतल्या. आदर्शगावासाठी गावकऱ्यांमधील एकजुटीमुळेच गावाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याची भावना व्यक्त करताना गावात वनव्यवस्थापन, जलव्यवस्थापनासोबत समाज व्यवस्थापन किती गरजेचे आहे, याबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.