शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

मराठा आरक्षणासाठी याचिकाकर्त्यांसह सुसंगत रणनीती आखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:31 IST

नाशिक : आरक्षणाची बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडत असून, यंत्रणेत समन्वयाचा अभाव आहे. सरकारने आता नाकर्तेपणा बाजूला ...

नाशिक : आरक्षणाची बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडत असून, यंत्रणेत समन्वयाचा अभाव आहे. सरकारने आता नाकर्तेपणा बाजूला ठेवून २५ जानेवारीपासून होणाऱ्या अंतिम सुनावणीसाठी सर्व याचिकाकर्त्यांना सोबत घेऊन आरक्षणासाठी सुसंगत रणनीती आखावी, अशी मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी शनिवारी (दि. १२) नाशिकमध्ये बोलताना केली आहे. मराठा आरक्षण सुनावणीसाठी पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. ९ डिसेंबर रोजी या घटनापीठासमोर सुनावणी झाली. मात्र, यावेळी आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवण्यात आली. ज्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आरक्षणास स्थगिती दिली होती, त्या तिन्हीही न्यायाधीशांचा पाच सदस्यीय न्यायाधीशांच्या घटनापीठात समावेश आहे. त्यामुळे ९ डिसेंबर रोजी सुनावणीत झालेला निर्णय अपेक्षितच होता, असेही मेटे म्हणाले. तसेच आरक्षणासंदर्भात सुनावणीसाठी सात अथवा नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाची मागणी राज्य सरकारने करणे आ‌वश्यक होते. त्यासाठी सरकारने कोणताही पाठपुरावा केला नाही. उलट काही याचिकाकर्त्यांनी पाच सदस्यीय घटनापीठाची मागणी केल्याने याचिकाकर्त्यांमधील असमन्वयही दिसून आला. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी सरकारने सर्व याचिकाकर्त्यांना सोबत घेऊन आरक्षणासाठी सुसंगत रणनीती आखण्याची गरज आहे.

----

इन्फो-

समाजात विसंवाद निर्माण करण्याचा आरोप

मराठा व ओबीसी समाजात विसंवाद निर्माण व्हावा, यासाठी राज्य सरकारमधील छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे मंत्री तसेच प्रकाश शेंडगेंसारखे ओबीसी नेते जाणीपूर्वक प्रयत्न करीत असल्याचा आरोपही विनायक मेटे यांनी केला. सरकारमधील मंत्री आणि महाआघाडीतील नेते ओबीसी व मराठा समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवार असे प्रकार गांभीर्याने घेत नसल्याने मराठा आरक्षणाच्याविरोधात मोर्चे काढले जात असल्याचेही मेटे म्हणाले.