शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
3
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
4
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
5
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
6
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
7
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
8
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
9
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
10
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
11
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
12
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
13
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
14
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
15
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
16
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
17
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
18
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
19
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

गरजूंची भूक भागविण्याचा निर्धार

By admin | Updated: July 21, 2014 00:41 IST

गरजूंची भूक भागविण्याचा निर्धार

नाशिक : जगभरातील देशांपैकी भारतात कुपोषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या बालकांची संख्या अधिक असून, देशातील महाराष्ट्र राज्य अव्वलस्थानी आहे. शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील विविध मोठमोठ्या हॉटेल्समधून उरलेले अन्न संकलित करून अन्नाची होणारी नासाडी थांबवून आदिवासी गाव, पाड्यांवर तसेच दुर्गम भागातील गरजूंपर्यंत पोहचवून त्यांची भूक भागविण्याचा निर्धार शहरातील काही युवकांनी केला आहे. शहरातील विविध हॉटेल्समध्ये मोठमोठे समारंभ पार पडतात. यावेळी मोठ्या प्रमाणात अन्न उरते. लॉन्स, मंगल कार्यालयांमध्ये अशीच काहीशी स्थिती थोड्याफार फरकाने पहावयास मिळते. यामुळे उरलेल्या अन्नाची नासाडी होते. शहरालगतचा गरजू घटक भुकेमुळे व्याकूळ होतो. आदिवासी दुर्गम भागात दिवसेंदिवस कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. सदर बाब लक्षात घेऊन महिनाभरापूर्वी स्थापन झालेल्या मयूर अलई फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. हॉटेल्स व मंगल कार्यालये आदि ठिकाणी उरलेल्या अन्नाचे योग्यरीत्या संकलन करून वातानुकूलित वाहनाद्वारे ते गरजू घटकांपर्यंत पोहचविणार असल्याची माहिती मयूर अलई यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. (प्रतिनिधी)