शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

उपाध्यक्षांनी मागविली बदल्यांची माहिती

By admin | Updated: June 25, 2014 00:15 IST

उपाध्यक्षांनी मागविली बदल्यांची माहिती

 

नाशिक : जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आलेल्या एकूण सर्व बदल्यांची, तसेच पदाधिकाऱ्यांच्या अधिकारातील बदल्यांची माहिती प्रशासनाकडून मागविली आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागांतर्गत करण्यात आलेल्या बदल्यांकडेच त्यांचा रोख असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप संपतराव सकाळेंकडून करण्यात येत आहे. त्यातच त्यांनी जिल्हा परिषदेचा निधी सर्व सदस्यांना समान वाटप झाला पाहिजे, त्यासाठी आपण सर्वपक्षीय सदस्यांचा एक दबाव गट निर्माण करू, असेही सांगितले आहे. मंगळवारी (दि.२४) त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून नुकत्याच करण्यात आलेल्या बदल्यांची माहिती मागविली आहे. बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याचा त्यांचा आरोप आहे. विशेषत: शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये तसेच पदाधिकाऱ्यांच्या अधिकारात करण्यात आलेल्या बदल्यांबाबत त्यांनी संशय व्यक्त केला आहे. न्यायालयाचे आदेश काय आहेत, प्रत्यक्षात बदल्या कोणत्या करण्यात आलेल्या आहेत, असे अनेक प्रश्न त्यांनी प्रशासनाकडे उपस्थित केले आहेत.(प्रतिनिधी)