शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीनंतरही मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना रोखले

By admin | Updated: May 28, 2017 15:08 IST

कर्जमाफी, समृध्दी महामार्ग, शेतकऱ्यांचे प्रश्न याबाबत फडणवीस भाषणामध्ये काय घोषणा करतात, या उत्सुकतेपोटी शेतकरी येण्याचा प्रयत्न करत...

नाशिक : समृध्दी महामार्गाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने केवळ मुख्यमंत्र्यांना काही मिनिटे शिष्टमंडळ भेटून संवाद साधण्याची परवानगी घेतली होती; मात्र शेतकऱ्यांना नाशिकच्या भगूर येथील सप्तश्रृंगी मंदिराच्या मैदानात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापासून पोलिसांनी रोखल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच काही शेतकऱ्यांना देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचे मोबाइलही जप्त केले होते. यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.सावरकर जयंतीनिमित्त भगूर येथील सावरकर यांच्या स्मारकाला भेट देऊन मुख्यमंत्री फडणवीस जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमासाठी भगूरकडे जिल्ह्यातील विविध गावांमधून शेतकरी पोहचत होते. कर्जमाफी, समृध्दी महामार्ग, शेतकऱ्यांचे प्रश्न याबाबत फडणवीस भाषणामध्ये काय घोषणा करतात, या उत्सुकतेपोटी शेतकरी येण्याचा प्रयत्न करत होते; मात्र गांधी टोपी आणि शेतकरी पोशाख बघून पोलिसांनी भगूरच्या दिशेने येणाऱ्या शेतकऱ्यांची वाहने माघारी धाडली, असा आरोप समृध्दी महामार्गविरोधी शेतकरी संघटनेने केला आहे.,स्थानिक कार्यक्रमाचे संयोजक पदाधिकारी भगूर पोलीस प्रशासन, देवळाली कॅम्प पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधींसोबत कार्यक्रमापुर्वी चर्चा करून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांच्यासोबत पाच मिनिटांची वेळ मिळावी, यासाठी परवानगीदेखील घेतली होती, अशी माहिती संघटनेचे राजू देसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली; शेतकरी कुठल्याही आंदोलनाच्या भूमिकेत अजिबात नव्हते; मात्र पोलिसांनी बळाचा वापर व दबावतंत्र निर्माण करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांना फडणवीस यांच्या कार्यक्रमापासून रोखले तसेच जे शेतकरी पोहचले त्यांनाही कार्यक्रमाच्या ठिकाणाहून ताब्यात घेत अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.या सर्व प्रकारामुळे समृध्दी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीने आता फडणवीस यांच्यासोबत चर्चा करायची नाही, असा निर्णय घेतला आहे. कारण शेतकऱ्यांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी पसरली आहे.