शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

निधी मुबलक असूनही पाच वर्षांत अवघी ४२ कोटींचीच कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:10 IST

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानात १ हजार कोटी रुपयांची कामे धरल्यानंतर पाच वर्षांत स्मार्ट सिटी कामेही पूर्ण करू शकली ...

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानात १ हजार कोटी रुपयांची कामे धरल्यानंतर पाच वर्षांत स्मार्ट सिटी कामेही पूर्ण करू शकली नाही. मुबलक निधी पडून असतानाही आतापर्यंत केवळ ४२ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून सुमारे साडेतीनशे केाटी रुपये अजूनही कंपनीकडेच पडून आहे. गेल्या वर्षी या कामांचा आढावा घेतल्यानंतर चालू आणि पूर्ण झालेल्या कामांची गती चार टक्के असल्याचे आढळले होते. आता उर्वरित दोन महिन्यांत अर्धवट कामे आणि अन्य कामे तरी पूर्ण होतील काय, असा प्रश्न आहे.

सामान्यत: केंद्र किंवा राज्य शासनाकडून एखादी घोषणा झाल्यानंतर त्याचे आर्थिक नियोजन करण्यात आले तरी वेळेत निधी येतोच असे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट सिटीचा मात्र या सरकारी कारभाराला अपवाद ठरला. नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने पाच वर्षांपूर्वी १ हजार १९०८ कोटी रुपयांचा आर्थिक आराखडा मंजूर करून शासनाकडे पाठवला होता. तो मंजूर झाल्यानंतर त्याचे दायित्वही ठरले होते. केंद्र शासनाकडून पन्नास टक्के, राज्य शासन आणि महापालिकेकडून उर्वरित पंचवीस- पंचवीस टक्के अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले होते. म्हणजेच ढोबळ मानाने केंद्र शासनाकडून पाचशे कोटी रुपये येणे अपेक्षित आहेत. त्यातील १९६ कोटी रुपये मिळाले आहेत. राज्य शासनाकडून २५० कोटी रुपयांपैकी अवघे ९८ कोटी तर नाशिक महापालिकेकडून २५० कोटी रुपयांपैकी २०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने नियमित निधी पाठवला नाही. मात्र, नाशिक महापालिकेच्या वतीने दरवर्षी पन्नास कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करून त्यानुसार दोनशे कोटी रुपये देण्यात आले आहेत. अपवाद फक्त याच वर्षाचा!

शासन आणि महापालिकेकडून मुबलक निधी मिळूनही प्रत्यक्षात कामे मात्र अत्यंत संथगतीने सुरू आहेत. आतापर्यंत ४९४ कोटी रुपयांचा निधी होऊनही पाच वर्षांत मोजकेच पाच ते सहा प्रकल्प पूर्ण आहेत. त्यावर ४२ कोटी रुपयेे खर्च झाले आहेत. उर्वरित निधीपैकी १५३ कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येत असले तरी ही कामे कार्यवाहीत आहेत. तीही कामे वादग्रस्त असून ही कामे कधी पूर्ण होतील, हेही सांगता येत नाही. नाशिक महापालिकेने शासनाच्या आदेशाला शिरसावंद्य मानून दरवर्षी पन्नास कोटी रुपये दिले असले तरी केंद्र शासन आणि राज्य शासनाने मात्र कामे बघून निधी दिला आहे. गेल्या वर्षीपासून तर केंद्र शासनाने एक छदामही दिलेला नाही.

इन्फो...

ही झाली पूर्ण कामे

- महाकवी कालिदास कला मंदिराचे नूतनीकरण

- महात्मा फुले कलादालन नूतनीकरण

- अमरधाममध्ये दोन विद्युत दाहिनी

- नेहरू उद्यानाचे नूतनीकरण

- ट्रॅश स्कीमर

- स्मार्ट रोड

इन्फो..

केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या वतीने निधीचे नियोजन करताना प्रत्येक प्रकल्पाचा खर्च लक्षात घेऊन त्यासाठी झालेल्या खर्चाचा आढावा घेऊन त्यांना प्रमाणपत्र द्यावे लागते, त्यानंतर निधीचे वितरण केले जाते; परंतु निधीचे वितरणच न झाल्याने गेल्या वर्षी शासनाने निधीच पाठवला नसल्याने स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही मान्य केले.