शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सुनसान पार्किंग; लख्ख प्रकाश

By admin | Updated: September 8, 2015 23:52 IST

विजेचा अपव्यय : महापालिकेचे दुर्लक्ष

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी प्रमुख मार्गावर करण्यात आलेल्या बाह्य वाहनतळावर सध्या सामसूम असूनही शेकडो विद्युत दिव्यांचा प्रकाशझोत रात्रभर कायम असून, त्यातून विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असतानाही महापालिकेने त्याकडे दुर्लक्षाची भूमिका घेतली आहे. पर्वणीसाठी बाहेरगावच्या भाविकांची वाहने गावाबाहेरच उभी करून त्यांना तेथून अंतर्गत वाहनतळापर्यंत आणण्यात येणार आहे. शहराला जोडणाऱ्या अशा मुख्य राष्ट्रीय, राज्य मार्गावर आठ ठिकाणी बाह्य वाहनतळ उभारण्यात आले असून, या ठिकाणी भाविकांसाठी निवाराशेड, शौचालय, मुतारी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य केंद्र, माहिती केंद्र उघडण्यात आले आहेत. साधारणत: बांधा, वापरा व हस्तांतर करा (बीओटी) या तत्त्वावर सदरचे वाहनतळ विकसित करण्यात आलेले असून, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर विजेची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक वाहनतळावर दोनशेहून अधिक हायमास्ट बसविण्यात आलेले आहे. पहिल्या पर्वणीला भाविकांना अगदीच अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे वाहनतळाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराचे नुकसान झाले, मात्र पहिल्या पर्वणीपासून दररोज रात्री शेकडो दिव्यांनी वाहनतळ लख्ख प्रकाशात न्हावून निघत आहे. (प्रतिनिधी)

 

नसता भुर्दंडसध्या या वाहनतळावर कोणीच वास्तव्यास नसून, फक्त सुरक्षारक्षक देखरेख करीत आहेत, तरीही दररोज शेकडो युनिट विजेचा अपव्यय केला जात आहे. पर्वणीच्या काळात विजेचा वापर करण्यास हरकत नाही, पण पर्वणीनंतरही तीच परिस्थिती कायम ठेवून नसता भुर्दंड महापालिका सोसत आहे.