शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

देशमानेत तीव्र पाणी टंचाई; टँकर सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 18:43 IST

देशमाने : गाव व परिसरातील वाडीवस्त्यावर तीव्र पाणीटंचाई असून वारंवार पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करूनही अद्याप टँकर सुरू न झाल्याने वाडीवस्त्यावरील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे प्रशासनाने या मागणीकडे अद्यापही दुर्लक्षच केले आहे.

देशमाने : गाव व परिसरातील वाडीवस्त्यावर तीव्र पाणीटंचाई असून वारंवार पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करूनही अद्याप टँकर सुरू न झाल्याने वाडीवस्त्यावरील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.पालखेड कालव्याचे पहिले आवर्तन जेमतेम मिळाले. अन अल्पसा पडलेला पाऊस यामुळे शिवारातील विहिरींनी जानेवारी महिन्यातच तळ गाठला. विहिरीत साठवून ठेवलेल्या पाण्यावर पुढील दोन महिने नागरिकांनी तहान भागविली. मात्र एप्रिलमध्ये पडलेल्या कडक उन्हात विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा याबाबत प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. मात्र लोकसभा निवडणुकीत व्यस्त असलेल्या प्रशासनाने या मागणीकडे अद्यापही दुर्लक्षच केले आहे.गत आठवड्यात जिल्हा दुष्काळ दौऱ्यावर आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसात टँकर सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र आठवड्यानंतरही कुठलीच कार्यवाही न झाल्याने नागरिकांवर अन्य ठिकाणाहून पाणी विकत घ्यावे लागत आहे.पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाºयाचा प्रश्नगंभीर झाला आहे. अनेकांनी आपली जनावरे पाणी व चाºयाअभावी विकण्यास सुरवात केली आहे.अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून शेततळी बनवून फळबागा उभ्या केल्यात. मात्र पाण्याअभावी शेततळी कोरडी पडल्याने शेततळ्याच्या आच्छादनाचे देखील उन्हामुळे मोठे नुकसान होत आहे. परिणामी परिसरातील फळबागा देखील सुकू लागल्याने शेतकºयांना दुहेरी संकटाना सामोरे जावे लागत आहे. अद्यापही पावसाळा सुरू होण्यास किमान महिनाभराचा कालखंड जाणार त्यातही पाऊस वेळेत पडला नाहीतर शेतकºयांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.दरम्यान, सध्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी तातडीने वाडी-वस्त्यांवर टँकर सुरू करावे असी मागणी सरपंच विमल शिंदे, शिवाजी शिंदे, गणेश दुघड, भागवत राठोड, अंतू काळे, योगेश गांगुर्डे, प्रभाकर जगताप, नानासाहेब शिंदे, भारत बोरसे, सखाहरी गोरे, कैलास जगताप, प्रभाकर जाधव, संजय जाचक, नितीन जगताप आदींनी केली आहे.फोटो १२ जायखेडा १, १२ जायखेडा २, १२ जायखेडा ३)१) विहिरी कोरड्या पडल्याने अन्यठिकानाहून पाणी आणून विहिरीत टाकताना.२)पाण्याअभावी कोरडी पडलेली शेततळी.३)आदिवासी वस्तीत टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना.