शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यात कसूर; मग कारवाई का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:15 IST

नाशिक : जिल्ह्यात निर्बंध लागू करतानाच अधिकाऱ्यांना अंमलबजावणीच्या सूचनादेखील देण्यात आलेल्या होत्या. मात्र, काहींनी सोयीची भूमिका घेत ...

नाशिक : जिल्ह्यात निर्बंध लागू करतानाच अधिकाऱ्यांना अंमलबजावणीच्या सूचनादेखील देण्यात आलेल्या होत्या. मात्र, काहींनी सोयीची भूमिका घेत सर्वकाही नागरिकांवरच सोडून दिले असेल तर अधिकारी म्हणून आपण कोणती जबाबदारी पार पाडली, असा सवाल उपस्थित करीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी यावेळी ठेवला.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ प्रशासकीय यंत्रणेच्या कारभाराबाबत संतप्त झाले. वाढती रुग्णसंख्या चिंता निर्माण करायला लावणारी असताना जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचे पालन होत नसेल तर त्यास केवळ नागरिक नव्हे तर अधिकारीदेखील जबाबदार असल्याचे त्यांनी सुनावले. कोरोनाला रोखण्यासाठी काही निर्बंध लागू करताना जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची देखील जबाबादारी निश्चित करून देण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होणे अपेक्षित होते; परंतु शहरात कुठेही यंत्रणा रस्त्यावर दिसत नसल्याचे सांगून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंतची मर्यादा असताना त्याची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी मनपा आणि पोलीस प्रशासनाची देखील आहे. मात्र, या यंत्रणा काम करीत नसल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. याबाबत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देखील जाब विचारला. यावेळी त्यांनी पेालीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांकडे बेाट दाखविल्याचे समजते. यावेळी या दोन्ही अधिकाऱ्यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालकमंत्र्यांचे समाधान झाले नाही. रस्त्यावर उतरून काम करण्याचा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

अधिकारी जागेवरून हलतच नसल्याचे सांगून त्यांनी संंबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारल्याचे देखील समजते. रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स कशी चालतात, याचा जाब त्यांनी पोलीस आयुक्तांना विचारला. उशिरा चालणाऱ्या हाॅटेल्सवरील कारवाईबाबत पोलीस आणि मनपा यांच्यात संभ्रम असण्याचे काहीच कारण नाही. दोहोंनी सामूहिक भूमिका घेऊन कारवाई करणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सुनावले. या दोन्ही यंत्रणेमधील गैरसमाजाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देखील त्यांनी जाब विचारल्याचे समजते.

--इन्फो--

आता तरी रस्त्यावर उतरा

अधिकारी केवळ कार्यालयात बसून राहणार असेल तर त्यांचे इतर अधिकारी तरी कसे कार्यतत्पर होणार, असा प्रश्न विचारत पालकमंत्री भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना आता तरी रस्त्यावर उतरून गर्दी नियंत्रणात आणण्याच्या सूचना केल्या. निर्बंधाचे उल्लंघन होत असताना कारवाईदेखील केली जाणार नसेल तर मग अधिकाऱ्यांचा जागेवरून हलवावे लागेल, असा स्पष्ट इशाराच त्यांनी दिला.