शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

कर्तव्यात कसूर; मग कारवाई का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:15 IST

नाशिक : जिल्ह्यात निर्बंध लागू करतानाच अधिकाऱ्यांना अंमलबजावणीच्या सूचनादेखील देण्यात आलेल्या होत्या. मात्र, काहींनी सोयीची भूमिका घेत ...

नाशिक : जिल्ह्यात निर्बंध लागू करतानाच अधिकाऱ्यांना अंमलबजावणीच्या सूचनादेखील देण्यात आलेल्या होत्या. मात्र, काहींनी सोयीची भूमिका घेत सर्वकाही नागरिकांवरच सोडून दिले असेल तर अधिकारी म्हणून आपण कोणती जबाबदारी पार पाडली, असा सवाल उपस्थित करीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी यावेळी ठेवला.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ प्रशासकीय यंत्रणेच्या कारभाराबाबत संतप्त झाले. वाढती रुग्णसंख्या चिंता निर्माण करायला लावणारी असताना जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचे पालन होत नसेल तर त्यास केवळ नागरिक नव्हे तर अधिकारीदेखील जबाबदार असल्याचे त्यांनी सुनावले. कोरोनाला रोखण्यासाठी काही निर्बंध लागू करताना जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची देखील जबाबादारी निश्चित करून देण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होणे अपेक्षित होते; परंतु शहरात कुठेही यंत्रणा रस्त्यावर दिसत नसल्याचे सांगून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंतची मर्यादा असताना त्याची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी मनपा आणि पोलीस प्रशासनाची देखील आहे. मात्र, या यंत्रणा काम करीत नसल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. याबाबत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देखील जाब विचारला. यावेळी त्यांनी पेालीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांकडे बेाट दाखविल्याचे समजते. यावेळी या दोन्ही अधिकाऱ्यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालकमंत्र्यांचे समाधान झाले नाही. रस्त्यावर उतरून काम करण्याचा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

अधिकारी जागेवरून हलतच नसल्याचे सांगून त्यांनी संंबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारल्याचे देखील समजते. रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स कशी चालतात, याचा जाब त्यांनी पोलीस आयुक्तांना विचारला. उशिरा चालणाऱ्या हाॅटेल्सवरील कारवाईबाबत पोलीस आणि मनपा यांच्यात संभ्रम असण्याचे काहीच कारण नाही. दोहोंनी सामूहिक भूमिका घेऊन कारवाई करणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सुनावले. या दोन्ही यंत्रणेमधील गैरसमाजाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देखील त्यांनी जाब विचारल्याचे समजते.

--इन्फो--

आता तरी रस्त्यावर उतरा

अधिकारी केवळ कार्यालयात बसून राहणार असेल तर त्यांचे इतर अधिकारी तरी कसे कार्यतत्पर होणार, असा प्रश्न विचारत पालकमंत्री भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना आता तरी रस्त्यावर उतरून गर्दी नियंत्रणात आणण्याच्या सूचना केल्या. निर्बंधाचे उल्लंघन होत असताना कारवाईदेखील केली जाणार नसेल तर मग अधिकाऱ्यांचा जागेवरून हलवावे लागेल, असा स्पष्ट इशाराच त्यांनी दिला.