शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

पोलीसपाटील मानधनापासून वंचित

By admin | Updated: March 26, 2015 00:15 IST

चार महिन्यांपासून प्रतीक्षा : शासनाकडून होते दुर्लक्ष; पोलीसही महत्त्व देत नसल्याचा संघटनेचा आरोप

नाशिकरोड : पोलीसपाटील म्हणून पूर्वी असलेला सन्मान आणि अधिकार मिळावेत यासाठी सातत्याने लढत असलेल्या पोलीसपाटलांना आता मानधनासाठीही संघर्ष करावा लागत आहे. गेल्या चार महिन्यांपासून मानधनदेखील मिळाले नसल्याने पोलीसपाटलांमध्ये नैराश्य आले आहे. पोलिसांचे प्रतिनिधी म्हणून गावागावांत पोलीसपाटील नियुक्त आहेत. मात्र पोलीस आता या पोलीसपाटलांचीच सेवा घेण्यास तयार नसल्याचे बोलले जात आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये सध्या २५ पोलीसपाटील असून, अनेक गावांत पोलीसपाटलांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. पोलीसपाटलांना शासनाकडून दरमहा तीन हजार रुपये मानधन दिले जाते; मात्र गेल्या चार महिन्यांपासून मानधनच देण्यात आलेले नाही. पोलीसपाटलांचा प्रवास व स्टेशनरी भत्ता तर कधीचाच बंद झाला आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात रिक्त जागेवर पोलीसपाटलांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे लक्ष द्यायला कोणीच तयार नाही. शासन व जनतेमध्ये समन्वय ठेवणे व घडलेल्या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना, शासनाला देणे आवश्यक आहे असे पोलीसपाटलाचे काम आहे. मात्र शहरीकरण व कामातील व्यापारीकरण वाढू लागल्याने पोलीसपाटील हे पद शोभेचे होऊन बसल्याचे पोलीसपाटलांचेच म्हणणे आहे. पोलीस ठाणे, तहसील कार्यालयात यापूर्वी महिन्याला पोलीसपाटलांची नियमित बैठक होत होती. कायदा-सुव्यवस्था, शासनाच्या योजना, जनतेतील प्रतिक्रिया आदि माहितींची देवाण-घेवाण करून प्रशिक्षण शिबिर घेतले जात होते. पूर्वी पोलीसपाटलांचे मानधन त्या-त्या पोलीस ठाण्याच्या मार्फत शासनाकडून दिले जात असत. मात्र गेल्या काही वर्षापासून शासनाकडून पगार-मानधन हे बॅँकेत खात्यावर जमा होऊ लागल्याने पोलीस ठाणे व पोलीस पाटील यांच्यातील अंतर वाढले. बैठका व इतर सर्व गोष्टी बंद पडल्याने पोलीस, जिल्हा प्रशासन व पोलीसपाटील यांच्यातील दरी वाढत चालली आहे. अवकाळी पावसाचे पंचनामे करताना तलाठी, सर्कल अधिकारी परस्पर गेले त्यांनी पोलीस पाटलांना सांगितले अथवा विचारले सुद्धा नाही. चोरटया गौण खनिजाबाबत पोलीस पाटलांनी पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाला माहिती देऊनही दुर्लक्ष केले जाते असाही पोलीसपाटील संघटनेचा आरोप आहे. (प्रतिनिधी)