शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

निर्यात केंद्रासह शाश्वत बाजारपेठेबाबतची उदासीनता ठरतेय प्रगतीत अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:19 IST

नितीन बोरसे लोकमत न्यूज नेटवर्क सटाणा : बागलाण हा प्रयोगशील शेतकऱ्यांचा तालुका आहे. अर्ली द्राक्ष आणि डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन ...

नितीन बोरसे

लोकमत न्यूज नेटवर्क

सटाणा : बागलाण हा प्रयोगशील शेतकऱ्यांचा तालुका आहे. अर्ली द्राक्ष आणि डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन काढून सातासमुद्रापार निर्यात करून जगाच्या नकाशावर बागलाणची नवी ओळख निर्माण करून तर दिलीच परंतु देशाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन देखील मिळवून दिले. असे असताना शासनाची मात्र निर्यात केंद्र व शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासोबतच डाळिंबावरील तेल्या रोगाचा नायनाट करणाऱ्या औषधाचे संशोधन करण्यासंदर्भात उदासीनता दिसून येत आहे. शासनाने या सुविधा उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस येतील.

बागलाण हा तसा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध तालुका आहे. सह्याद्री डोंगररांगा याच भागातून आहेत. भौगोलिक क्षेत्र आणि पोषक हवामानाचा अंदाज घेत या तालुक्यातील शेतकरी निरनिराळे प्रयोग करीत असतो. दोन दशके डाळिंब पिकाची सर्वाधिक लागवड होती. ३५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र डाळिंब पिकाने तर अडीच हजार हेक्टर क्षेत्र अर्ली द्राक्ष पिकाने व्यापले होते. या पिकाने खऱ्या अर्थाने येथील शेतकऱ्यांना लक्ष्मी दर्शन दिले. या भागातील शेतकऱ्याने अन्य भागातील शेतकऱ्यांना दिशा देण्याचे काम केले. मात्र, दरम्यानच्या काळात या पिकाला दृष्ट लागली. तेल्यासारख्या महाभयंकर रोगाने डाळिंब पिकावर आक्रमण केले. शासनाने अनेक संस्थांकडून या रोगाच्या उच्चाटनासाठी सर्व पातळीवर संशोधन झाले. मात्र, तेल्या रोगाने डाळिंबाचे आगार उद्ध्वस्त झाले. शेतकरी कर्जबाजारी झाला तरी त्यावर आजही उपाय सापडू शकला नाही ही शोकांतिका आहे. डाळिंबाला पर्याय म्हणून बागलाणच्या शेतकऱ्याने अर्ली द्राक्षाला पसंती दिली. सुरुवातीला या पिकाने बऱ्यापैकी हात दिला. परंतु, कधी अतिवृष्टी, गारपीटसारख्या अस्मानी संकटाने दगा दिला तर कधी व्यापाऱ्यांनी गंडा घातला अशा दुहेरी संकटाने पिच्छा न सोडल्याने पुन्हा या भागातील शेतकरी डाळिंब पिकाकडे वळला आहे. आजच्या घडीला १५ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब लागवड आहे. त्यापैकी ७ हजार हेक्टर क्षेत्रावर नव्याने लागवड झाली आहे.

तेल्यावर संशोधनाची गरज

आजच्या घडीला डाळिंब पीक बागलाणचे मुख्य पीक आहे. शेतकरी पोटच्या गोळ्यासारखी या पिकाची जतन करतात. हजारो रुपये खर्च करून बहार घेतो. मात्र, हातातोंडाशी आलेल्या पिकावर तेल्या आक्रमण करून घास हिरावून घेतो. यामुळे शेतकरी अधिक आर्थिक संकटाच्या खाईत लोटला जातो. शासनाने शेतकऱ्याच्या पसंतीला उतरलेल्या या पिकाला वाचविण्यासाठी तेल्यासारख्या रोगाचा नायनाट करण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. मात्र, याबाबत शासन उदासीन दिसत आहे. शासनाने लखमापूर येथे डाळिंब संशोधन केंद्र उभारले आहे. मात्र, त्याच्यात काय संशोधन केले जाते हा संशोधनाचा विषय बनला आहे.

निर्यात केंद्र उभारण्याची गरज...

बागलाणच्या अर्ली द्राक्ष आणि डाळिंबाने आखाती आणि युरोपीय देशांना भुरळ घातली आहे. परकीय चलन मिळवून देणाऱ्या या पिकांसाठी निर्यात केंद्र उभारण्याची आवश्यकता आहे. कोल्ड स्टोरेज तयार केल्यास या फळाच्या निर्यातीला चालना मिळून शेतकऱ्याच्या पदरात दोन पैसे पडतील. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

उन्हाळ कांदा पीक घेण्यातही अग्रेसर..

बागलाण तालुक्यात उन्हाळ कांदादेखील मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. दरवर्षी सुमारे आठ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ कांद्याची लागवड केली जाते. मंदीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये म्हणून शासनाने कांदा चाळ योजना सुरू केली आहे. कांदा साठवण व्यवस्था प्रत्येक शेतकऱ्याने शासनाचे कांदा चाळ अनुदान किंवा स्वखर्चाने कांदा चाळ उभारून केली आहे. तालुक्यात तब्बल साडे सहा हजार कांदा चाळी उभारण्यात आल्या आहेत. या भागातील कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी पसंती आहे. या तालुक्यात ॲग्रो प्रोड्युसर कंपन्या निर्माण झाल्याने कांद्यावर प्रक्रिया करणारे उद्योगही सुरू झाले आहेत. त्यामुळे कांदा पिकासाठी ही जमेची बाजू आहे.